Deepak Kulkarni
संपूर्ण देशभरात सोमवारी (ता.26) 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्यपथावर भारताच्या तिन्ही सैन्यदलांनी आपली ताकद अन् शौर्याचं सर्वोत्तम सांघिक प्रदर्शन करण्यात आलं.
विविध देशातील प्रमुख पाहुणे तसेच देशभरातील अनेक मान्यवर या कर्तव्यपथावरील परेड पाहण्यासाठी सहभागी होत असतात. तसेच वृत्तवाहिन्यांवरही याचं प्रक्षेपण दाखवलं जातं.
भारतीय सैन्यदलाच्या भूदल (Army),हवाई दल (Air Force) अन् नौदल (Navy) यांचे सॅल्यूट करण्याची पध्दत वेगवेगळी का आहे ?
भारतीय सैन्यदल हे जगातील सर्वोत्तम सैन्यदलांपैकी एक समजलं जातं. पण आपल्या तीनही दलाच्या जवानांची सॅल्यूट करण्यापाठीमागं ऐतिहासिक व धोरणात्मक कारणं सांगण्यात येतात.
नौदलाच्या जवानांची सॅल्यूट करण्याची पद्धत थोडी निराळी आहे. तळहात जमिनीकडे वाकवत सॅल्यूट करण्यात येतो. या पद्धतीत तळहात समोरून दिसत नाही. पूर्वी युध्द नौकांवर ड्युटी निभावत असताना मळलेला किंवा तेलकट हात वरिष्ठांना दाखवून सॅल्यूट करणं बैशिस्तपणा व अनादरपूर्वक कृती समजली जात असत.
भारताचे सर्वात प्रगत दल म्हणून जगभरात भारतीय वायुदलाचा नावलौकिक आहे. भारतीय वायुदलाच्या स्थापनेपासून ते 2006 पर्यंत भारतीय सैन्याप्रमाणेच सॅल्युट केला जात होता. पण 2006 मध्ये सॅल्युटमध्ये बदल करण्यात आला. तळव्याची ही स्थिती 45 अंश कोनात असतो. हाताच्या तळव्याची स्थिती ही आकाशात झेपावणाऱ्या विमानाप्रमाणे दिसते. हे वायुसेनेच्या कार्याचं प्रतीक मानलं जातं.
भारतीय लष्कराच्या जवानांकडून संपूर्ण पंजा समोर उघडा ठेवून सॅल्यूट केले जातात. बोटे आणि अंगठा एकमेकांना जोडलेले असून मध्य बोट कपाळाला लागलेले असते. याचा अर्थ ज्या कुणा अधिकाऱ्यांना सॅल्यूट केला जातोय ,त्यांच्याप्रती पारदर्शकता, आदर आणि विश्वास व्यक्त करणे हा अर्थ असतो.