Ganesh Sonawane
मतदान केल्यानंतर बोटावर लावली जाणारी शाई ही मतदाराने मतदान केल्याचा अधिकृत पुरावा असते. ही शाई निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या खास रासायनिक मिश्रणातून तयार केली जाते.
डाव्या हाताच्या तर्जनीवर ही शाई लावली जाते. यामुळे एकदाच मतदान झाल्याचं स्पष्ट ओळखता येतं.
या शाईचा मुख्य उद्देश म्हणजे बोगस मतदान रोखणे. मतदानानंतर पुन्हा मतदान करायला येणारा व्यक्ती लगेच ओळखली जाते.
शाई लावल्यानंतर ती किमान १५ ते २० दिवस टिकते, सहज निघत नाही. त्यामुळे मतदानातील फसवणूक रोखता येते.
जर कोणी वेषांतर करून दुसऱ्याच्या नावाने मतदान करायला आला, तर त्याच्या बोटावरची शाई पाहून लगेच त्याला ओळखता येते.
ही शाई तयार करणारी एकमेव संस्था म्हणजे मैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेड (Mysore Paints & Varnish Ltd.). ही कंपनी निवडणूक आयोगासाठी वर्षानुवर्षे शाई पुरवते.
शाईत सिल्वर नायट्रेट (Silver Nitrate) असते, ज्यामुळे ती त्वचेवर दीर्घकाळ टिकते. ती सुरक्षित आहे आणि आरोग्यास हानिकारक नाही.
मतदाराच्या बोटावरची शाई ही लोकशाहीचा सन्मान दर्शवते. मतदान केल्याची ती एक खून आहे. तसेच एक मतदार म्हणून आपला अधिकार वापरल्याचा अभिमानाचा ठसा असतो.