Ganesh Sonawane
न्यायालयात फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायाधीश पेनाची निब तोडतात. ही एक प्रतीकात्मक कृती आहे.
फाशी हा सर्वात कठोर आणि अंतिम दंड आहे. त्यामुळे न्यायाधीश या निर्णयाची गंभीरता व्यक्त करण्यासाठी निब मोडत त्याचे गांभीर्य दर्शवतात.
याची सुरुवात स्वातंत्र्यानंतर 1949 पासून झाली होती. जेव्हा महात्मा गांधी यांची हत्या केल्याप्रकरणी नथुराम गोडसेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
पेनाची निब मोडणं म्हणजे हा निर्णय आता बदलता येणार नाही (trial court स्तरावर).
या कृतीनं न्यायालयाने आपलं काम पूर्ण केल्याचं दर्शवलं जातं. अशी शिक्षा सुनावण्याची वेळ पुन्हा येऊ नये असाही त्यामागचा हेतू असतो.
ज्या पेनाने फाशीसारखा अंतिम निर्णय लिहिला/सही केली, त्याचा पुन्हा वापर न करण्याचं प्रतीक म्हणून निब तोडली जाते.
ही कृती कायद्यात बंधनकारक किंवा नियम नसून एक जुनी न्यायालयीन परंपरा आहे. ज्यामुळं सर्वच न्यायालयं किंवा न्यायाधीश ही परंपरा पाळतातच असं नाही.
पेनाची निब तोडण्याची कृती किंवा ही परंपरा भावनिक अलिप्तता दर्शवते. न्यायाधिशाने वैयक्तिक भावना बाजूला ठेवून कायद्याला सर्वोच्च स्थान दिल्याचे दर्शवते.
फाशीचा निर्णय दिल्यानंतरही वरच्या न्यायालयात (High Court, Supreme Court) या निर्णयाला आव्हान देण्याची संधी असते.