Rashmi Mane
दरवर्षीच्या महाराष्ट्र बोर्डाच्या 10 वी व 12 वी परीक्षेत कोकण विभाग नेहमीच आघाडीवर असतो. यावर्षीही तोच इतिहास कायम राखत कोकण विभाग: 96.74% लागला आहे. पण यामागचं खरं कारण काय?
दरवर्षी प्रमाणे यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलांचा निकाल 89.51 टक्के तर मुलींचा निकाल 94.58 टक्के लागला आहे.
कोकण – 96.74%, कोल्हापूर – 93.64%, मुंबई – 92.93%, संभाजीनगर – 92.24%, अमरावती – 91.43%, पुणे – 91.32%, नाशिक – 91.31%, नागपूर – 90.52%, लातूर – 89.46%
महाराष्ट्रात सर्वाधिक यश पुन्हा एकदा कोकणच्या वाट्याला. पण हे शक्य होतं कसं?
कोकणात शहरी गोंगाट नाही, निसर्गाच्या सान्निध्यात एकाग्रता टिकते, अभ्यास सखोल होतो.
विद्यार्थ्यांची संख्या कमी, त्यामुळे शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देतात. शंका समजून घेऊन त्या सोडवल्या जातात.
कोकणात क्लासेसपेक्षा शाळेतील शिकवण आणि पुस्तकांवर भर असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे बेसिक्स मजबूत होतात.
तिथे शिक्षण म्हणजे स्पर्धा नसून विकासाचं साधन मानलं जातं. तणाव नसेल तर गुणवत्ताही टिकते.