Mumbai Rain: महाराष्ट्राची राजधानी मुंबई दर पावसाळ्यात का तुंबते? 5 मोठी कारणं आली समोर

Deepak Kulkarni

मुंबईची 'तुंबई' का होते?

दरवर्षी पावसाळ्यात महाराष्ट्राची राजधानी मुंबईची 'तुंबई' का होते? महापालिकेचं अब्जावधी रुपयांची आर्थिक तरतूद असूनही मुंबईकरांना मोठा मनस्ताप का सहन करावा लागत आहे. पाहा ५ मोठी कारणं...

Mumbai Rain | Sarkarnama

हमखास पाणी तुंबते

पावसाळ्यात दरवर्षी हिंदमाता, सायन (गांधी मार्केट), अंधेरी (मिलन सबवे), कुर्ला आणि माटुंगा यांसारख्या सखल भागात हमखास पाणी तुंबल्याचं आपल्याला पाहायला मिळते.

Mumbai Rain | Sarkarnama

६५ वर्षांत सत्ता बदलली, पण नशीब नाही!

गेल्या ६५ वर्षांत मुंबईवर वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी राज्य केले. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालि६५ वर्षांत सत्ता बदलली, पण नशीब नाही!

गेल्या ६५ वर्षांत मुंबईवर वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी राज्य केले. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालि

Mumbai Rain | Sarkarnama

65 वर्षांत सत्ता बदल...

गेल्या ६५ वर्षांत मुंबईवर वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी राज्य केले. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असूनही, नियोजनशून्य विकास आणि दूरदृष्टीच्या अभावामुळे हे सर्वपक्षीय 'कलेक्टिव्ह फेल्युअर' ठरले आहे.

Mumbai Rain | Sarkarnama

तब्बल 140 वर्षे जुनी ड्रेनेज सिस्टीम

मुंबईची भुयारी गटारे ही ब्रिटीशांनी निर्माण केली असून जी तासाला अवघा 25 मिमी पाऊस पचवू शकतात. मात्र, मागच्या 65 वर्षांत हवामान बदललं, पाऊस वाढला, पण प्रशासनानं या यंत्रणेची क्षमता वाढवण्याकडे दुर्लक्ष केलं आहे.

Mumbai Rain | Sarkarnama

नैसर्गिक पाण्याचे मार्गच रोखले..

मुंबईचे अतिरिक्त पाणी समुद्रात नेणारी 'मिठी नदी' गेल्या ६ दशकांत बेकायदेशीर बांधकामांमुळे आक्रसत गेली. नदीचे रूपांतर नाल्यात झाले आणि २००५ च्या महापुरानंतरही प्रशासनाने यातून कोणताही धडा घेतला नाही.

Mithi River | Sarkarnama

निसर्गाचा 'स्पंज' नष्ट

शहरात समुद्राचे पाणी येण्यापासून रोखणारी कांदळवने बिल्डरांच्या फायद्यासाठी उद्ध्वस्त करण्यात आली. संपूर्ण मुंबईत काँक्रिटीकरण झाल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरायला जागाच उरलेली नाही.

Cement Concrate Road | Sarkarnama

'ब्रिमस्टोवॅड' प्रकल्प

1995 च्या पूरानंतर ड्रेनेज क्षमता वाढवण्यासाठी 'ब्रिमस्टोवॅड' योजना आखली गेली. 40 वर्षे आणि हजारो कोटी रुपये वाहून गेले, तरी नोकरशाही व राजकीय अनास्थेमुळे हा प्रकल्प आजही 100% पूर्ण झालेला नाही.

Mumbai Rain | Sarkarnama

शेकडो कोटींचा गाळ!

मुंबईत पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढली जातात. पण हा गाळ बहुतांश वेळा फक्त कागदावरच निघतो, ज्यामुळे पहिल्याच मुसळधार पावसात नाले ओसंडून वाहतात.

Mumbai Rain | Sarkarnama

NEXT: नाशिकमध्ये ढगफुटीची शक्यता कोणत्या भागात आणि का?

Nashik Cloudburst, Nashik Rain Alert | Sarkarnama
येथे क्लिक करा...