सरकारनामा ब्यूरो
IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीत अनेकदा अशा घटना घडतात. जे त्यांच्या आयुष्याला कलाटणी देऊन जातात. अशीच एक प्रेरणादायी स्टोरी आहे, ती म्हणजे आंचल गोयल यांची.
महाराष्ट्र केडरच्या IAS आंचल गोयल ज्यांना शेवटच्या क्षणी जिल्हाधिकारीपद स्वीकारण्यापासून रोखण्यात आले होते. आज त्या मुंबईच्या जिल्हाधिकारी आहेत.
मूळच्या पंजाबच्या रहिवासी असलेल्या आंचल गोयल याआधी नागपूर येथे कार्यरत होत्या.
त्यांनी चंदीगड येथून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये बीएची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरु केली.
2013ला UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. एका वर्षाचे ट्रेनिंग घेतल्यानंतर त्यांची नियुक्ती IAS पदी करून आंचल यांना महाराष्ट्र केडर देण्यात आले.
केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागात सहाय्यक सचिव म्हणून कार्यरत होत्या. तसेच आचंल गोयल यांनी परभणी येथे महत्त्वाच्या पदावर कार्यभार सांभाळला आहे.
आंचल यांनी पालघर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि आदिवासी प्रकल्प अधिकारी म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. काही दिवसांसाठी रत्नागिरी येथे सहाय्यक संचालक आणि नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी कार्यभार सांभाळला.