Pradeep Pendhare
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ इथं महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहिली.
मुख्यमंत्री योगी यांनी उत्तर प्रदेशात बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे असतील, तिथं सरकारच्यावतीनं पुतळ्यांच्या सुरक्षेच्या व्यवस्थेची घोषणा केली.
मुख्यमंत्री योगी यांनी जिथं बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आहेत, तिथं भिंती आणि छत बांधून संरक्षण केले जाईल.
बाबासाहेबांच्या पुतळ्यांना नुकसान पोहोचवण्याचा आजही काही घटक प्रयत्न करतात. त्यामुळे सरकार त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि आदरासाठी पावले उचलत असल्याचे मुख्यमंत्री योगी यांनी म्हटलं.
काँग्रेसच्या जुन्या धोरणांवर निशाणा साधताना, योगी आदित्यनाथ यांनी बाबासाहेबांच्या इशाऱ्याची आठवण करून देत, त्यांनी दाखवलेल्या मार्गावर एकजुटीनं चालण्याचा संदेश समाजाला दिला.
मुख्यमंत्री योगी यांनी, बाबासाहेबांनी नेहमीच न्याय, समानता आणि बंधुत्वाचा संदेश दिला आणि राष्ट्रीय हिताविरुद्ध असलेल्या कोणत्याही धोरणाला स्पष्टपणे नकार दिला.
मुख्यमंत्री योगी यांनी पुनरुच्चार करत यूपी सरकार प्रत्येक पुतळ्याची सुरक्षा, संरक्षण अन् आदर सुनिश्चित करेल आणि कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा दिला.
आज जनतेला ज्या काही सुविधा मिळत आहेत, त्या आंबेडकरांच्या दूरदर्शी विचारसरणी अन् संविधानाच्या मजबूत पायाचे परिणाम असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं.
बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करून आणि त्यांच्या आदर्शांचे पालन करण्याची प्रतिज्ञा देखील योगी आदित्यनाथ यांनी म्हटले.