Roshan More
हिंदुत्वादी संघटनांकडून खुलताबाद येथे असलेले औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे.
औरंगजेबाच्या कबरीला कायद्याने संरक्षण असल्याने ती हटवता येणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायदा (AMASR) या कायद्यामुळे औरंगजेबाची कबर हटवली जाऊ शकत नाही.
AMASR कायद्यानुसार राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारके आणि पुरातत्व स्थळांच्या जतन केले जाते. केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेले भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) या कायद्याअंतर्गत काम करते.
100 वर्षांपेक्षा अधिक काळ झालेल्या स्मारके, स्थळांना या कायद्यानुसार संरक्षण दिले जाते. सांची येथील बौद्ध स्तूपाला देखील याच कायद्यानुसार संरक्षण आहे.
कोणार्क येथील सूर्य मंदिर आणि बृहदेश्वर मंदिर यासारख्या विविध स्थापत्य शैलींचे प्रदर्शन करणारी ऐतिहासिक मंदिरांना देखील या कायद्याने संरक्षण आहे.
कुतुबमिनार, औरंगजेब आणि हुमायूनच्या कबरींना देखील या कायद्याने संरक्षण आहे. या कायद्यानुसार संरक्षित वस्तुच्या आसापास बदल करू शकत नाही.
राजगड, लाल किल्ला आणि म्हैसूर पॅलेससारखे या सारख्या किल्ले आणि राजवाड्यांना देखील संरक्षण आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.