Chetan Zadpe
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली, त्याचे पडसाद नाशिकमध्ये उमटले आहेत.
यंत्रणांचा गैरवापर करूनही मोदी यांना पराभवाची जाणीव झाली आहे. त्यामुळे ते विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध ईडीचा गैरवापर करीत आहेत. असा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.
यावेळी नाशिक शहरातील मेहेर चौकात आपच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता.
आज दुपारी बाराला आपचे कार्यकर्ते आंदोलनासाठी जमणार होते. मात्र सकाळी दहा पासूनच पोलीस सतर्क झाले होते. या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी पक्षाचे संघटन मंत्री नवीन दर्शन अहलूवालिया केंद्रातील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्यावरुन ही कारवाई झाल्याचा आरोप करत याचा निषेध केला.
केजरीवाल यांनी येथे लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचार करू नये यासाठी त्यांना रोखण्याचा हा डाव आहे.
आम आदमी पक्षाच्या या दिल्ली आणि पंजाबमधील कामाच्या जनतेचा प्रचंड प्रतिसाद आणि विश्वास मिळत आहे. यामुळे भाजप सूडबुद्धीने काम करत असल्याचा आरोप आपने केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.