Akshay Sabale
बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा सहा हजार मतांनी पराभव केला आहे.
बजरंग सोनवणेंनी पंकजा मुंडेंचा पराभव केल्यानं ते 'जायंट किलर' ठरले आहेत. सोनवणेंच्या विजयाची कारणे जाणून घेऊया....
पंकजा मुंडेंच्या बाजूने नेत्यांची फौज उभी होती. यामुळे बजरंग सोनवणेंना सहानुभूती मिळाली.
सोनवणेंनी लोकसभेत मराठा आरक्षणासंदर्भात आवाज उठवण्याचं आश्वासन दिलं.
प्रचारावेळी सोनवणेंनी शरद पवार अन् मनोज जरांगे-पाटील यांची स्तुती केली.
मुस्लिम समाजाची सोनवणेंना एकतर्फी साथ मिळाली.
बजरंग सोनवणेंनी प्रत्येक दिवशी 30 ते 40 गाव, वाडी, वस्तीवर थेट जाऊन संपर्क केला.
जिथे राष्ट्रवादीची कार्यकर्त्यांची फळी नाही, तिथे मराठा समाजातील तरूणांनी सोनवणेंसाठी यंत्रणा राबवली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर शरद पवारांना मिळालेली सहानुभूती सोनवणेंना फायद्याची ठरली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.