Aslam Shanedivan
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमीन आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते
या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी अशी मागणी शेतकर्यांसह विरोधकांनी महायुती सरकारकडे केली होती.
त्या प्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जवळपास 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले.
ज्यातून 40 लाख शेतकर्यांना लाभ झाला. पण काही शेतकर्यांना लाभ मिळाला नाही किंवा ती 2 एकर पर्यंतच मिळाली.
यामुळे आता आणखी 11 हजार कोटी रुपयांची मदत सरकराने जाहीर केली असून त्याला मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
तर ही मदत 15 दिवसांत अतिवृष्टग्रस्त जिल्ह्यातील किमान 90 टक्के शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.
यावेळी त्यांनी बँक खात्यामध्ये तांत्रिक अडचण, नोंदींमध्ये त्रुटी, एकापेक्षा जास्त खाती असल्याचे समोर आले असून या त्रुटी तपासून उर्वरित 10 टक्के शेतकर्यांपर्यंतही तातडीने मदत पोहचवली जाईल अशी ग्वाही दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.