Rashmi Mane
काशीची ओळख असलेला मणिकर्णिका घाट म्हणजे जीवन-मरणाच्या सत्याचे प्रतीक. जिथे कधीही अग्नि शांत होत नाही, त्या घाटाचा आता ऐतिहासिक बदल सुरू झाला आहे.
234 वर्षांनंतर या पवित्र स्थळाचा कायापालट होत असून, तो आधुनिक सुविधांनी सज्ज होणार आहे. 1771 मध्ये लोकमाता अहिल्याबाई होळकर यांनी मणिकर्णिका घाट उभारला.
त्यानंतर शतकानुशतके तो जसा आहे तसाच राहिला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने या घाटाचा पुनर्विकास प्रत्यक्षात येत आहे.
दररोज शेकडो अंत्यसंस्कार, अरुंद जागा आणि अपुऱ्या सुविधांमुळे भाविकांची गैरसोय होत होती. ही समस्या ओळखून घाटाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नव्या आराखड्यानुसार 38 सुसज्ज प्लॅटफॉर्म उभारले जाणार आहेत. यामुळे अंत्यसंस्कारासाठी वाट पाहावी लागणार नाही आणि प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित होईल.
दोन मजली इमारतीत नोंदणी कार्यालय, प्रतीक्षा कक्ष आणि पिण्याच्या पाण्याची सोय असेल. नातेवाईकांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे.
गंगा आरती आणि घाटाचे दृश्य पाहण्यासाठी खास व्ह्यू गॅलरी उभारली जाणार आहे. यामुळे भाविकांना अध्यात्मिक अनुभव अधिक सुलभ होईल.
गंगा नदीला पूर आला तरी विधी थांबू नयेत, यासाठी उंच आणि मजबूत रचना करण्यात येत आहे. लाकूड वाहतुकीसाठी स्वतंत्र रॅम्पही असणार आहे.
नूतनीकरणात प्राचीन मंदिरे, शिल्पकला आणि धार्मिक परंपरा जपल्या जाणार आहेत. आधुनिकतेसोबत काशीची आत्मा टिकवण्यावर भर दिला जाणार आहे.
डिजिटल स्लॉट व्यवस्थापन आणि आधुनिक देखरेखीमुळे मणिकर्णिका घाट अधिक सुटसुटीत होईल. श्रद्धा, सुविधा आणि सन्मान यांचा संगम म्हणजेच नवा ‘हायटेक मोक्षधाम’.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.