Pradeep Pendhare
सुरक्षा ठेवीतून थकबाकीची रक्कम कपात केली जाईल, असा नवीन नियम महावितरण केला आहे.
या नियमाची अंमलबजावणी 15 जुलैपासून महावितरणे राज्यात सुरू केली आहे.
सर्व संवर्गातील वीज ग्राहकांकडे वीज देयकाची थकबाकी दरवर्षी वाढते आहे.
दोन महिन्यांचे वीज देयके थकल्यास तिसऱ्या महिन्यात ग्राहकाच्या सुरक्षा ठेवीतून थकबाकी रक्कम कपात केली जाणार आहे.
ही रक्कम महावितरणने कापल्यानंतर ग्राहकाला प्रथम सुरक्षा ठेव अन् त्यानंतर देयकाची रक्कम भरणे बंधनकारक असेल.
ही रक्कम न भरल्यास वीज ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून होईल.
वीज जोडणी शुल्क भरूनच पुन्हा ग्राहकाला पूर्ववत वीजपुरवठा होईल.
सर्वच संवर्गातील वीज देयकांची थकबाकी वाढली असून, प्रत्येक वर्षी ती वाढतच आहे. यातून महावितरण वीज कंपनी आर्थिक अडचणीत आहे.
महावितरण वीज कंपनी आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी हा नवीन नियम कितपत फायदा ठरतो, हा येणार काळच सांगेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.