Rajanand More
पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार मौसम नूर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
बंगालमधील पुढील काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक आहे. त्याआधीच नूर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा झटका मानला जात आहे.
नूर या राज्यसभेच्या खासदार आहेत. २०२० मध्ये त्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली होती. येत्या एप्रिलमध्ये त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्या आता राजीनामा देणार आहेत.
नूर यांच्या पक्षप्रवेशाने काँग्रेसची ताकद वाढली आहे. प्रामुख्याने मालदा भागासह परिसरामध्ये पक्षाला मोठा फायदा होऊ शकतो.
मौसम नूर या मालदा उत्तर मतदारसंघाच्या दोनदा खासदारही होत्या. हा मतदारसंघ आता भाजपकडे आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश. पुन्हा निवडणूक लढविली. मात्र भाजप उमेदवाराकडून पराभव.
पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचा एकही आमदार नाही. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला भोपळाही फोडता आला नव्हता.
काँग्रेसने नूर यांना पक्षात घेत थेट ममतादीदींना आव्हान दिले आहे. नूर यांनीही राज्यात काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी ताकद लावणार असल्याचे म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.