Roshan More
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटिश सत्तेतून मुक्त झाला.
15 ऑगस्ट 1947 या ऐतिहासिक दिवशी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरून पहिल्यांदा तिरंगा फडकवला आणि भाषण केले.
प्रथेनुसार 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर झेंडा पंतप्रधान फडकवतात, तर 26 जानेवारीला राष्ट्रपती झेंडा फडकवतात.
पंतप्रधान हे सरकारचे कार्यकारी प्रमुख आहेत आणि देशाच्या प्रशासनाची जबाबदारी त्यांच्याकडे असते.
पंतप्रधान भाषणातून देशाच्या कामगिरीचा आढावा, आव्हाने आणि भावी योजना मांडतात.
राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख असून औपचारिक व घटनात्मक भूमिका बजावतात, पण 15 ऑगस्ट हा कार्यकारी सरकारच्या नेतृत्वाचा दिवस मानला जातो.
पंडित नेहरूंपासून आजपर्यंत सर्व पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले आहे.
पंतप्रधानांचे भाषण जगभर प्रसारित होते, त्यामुळे भारताची भूमिका आणि धोरणे जगासमोर मांडण्याची संधी मिळते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.