‘वंचित’ला लोकसभा निवडणुकीत मिळालेली मते विधानसभेसाठी फायद्याची

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी जरी खासदारकीपासून ‘वंचित’ राहिली असली तरी राज्यभरात वंचित बहुजन आघाडीला मिळालेले मते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनुकूल ठरणारे आहे. राज्यातील तब्बल 38 मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तिसऱ्या स्थानावर राहिले आहे. मतदारांमध्ये आपली जागा निर्माण करणाऱ्या वंचित आघाडीच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
‘वंचित’ला लोकसभा निवडणुकीत मिळालेली मते विधानसभेसाठी फायद्याची

अकोला : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी जरी खासदारकीपासून ‘वंचित’ राहिली असली तरी राज्यभरात वंचित बहुजन आघाडीला मिळालेले मते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनुकूल ठरणारे आहे. राज्यातील तब्बल 38 मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तिसऱ्या स्थानावर राहिले आहे. मतदारांमध्ये आपली जागा निर्माण करणाऱ्या वंचित आघाडीच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
    
सामाजिक असो वा राजकीय क्षेत्रात वंचितांना न्याय मिळत नाही. त्यामुळे त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. समाजातील बारा बलुतेदारांना सोबत घेवून राज्यात तिसरा पर्याय उभा करण्याचा प्रयत्न झाला. त्याला साथ मिळाली ती ‘एमआयएम’ची. अठरापगड जाती-धर्माचे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीसोबत आले. त्यानंतर बाराबलुतेदारांना प्राधान्य देत लोकसभा निवडणुकीत उमेदवार घोषित केले. 

निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांनी आपली ताकत पणाला लावली. मात्र, काल (ता.24) लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीच्या 47 उमेदवारांपैकी एकही उमेदवार निवडून आला नाही. वंचित बहुजन आघाडीचा घटक पक्ष असलेल्या ‘एमआयएम’ला औरंगाबाद येथील एका जागेवर विजय मिळविता आला. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी अपेक्षीत यश आले नसले तरी राज्यातील 38 मतदार संघात तिसऱ्या स्थानी राहून मताधिक्य मिळविण्यास यश आले आहे. तर अकोला व पालघर मतदार संघात उमेदवार हे दुसऱ्या स्थानावर राहिले. हे मताधिक्य वंचित बहुजन आघाडीसाठी विधानसभेकरिता जमेची बाजू मानल्या जात आहे. 

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मोठ्या संख्येने मते घेतल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवारांना मोठे धक्के बसले आहे. परिणामी, आता आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काय गोंधळ घालते याची चर्चा सुरू झाली आहे.

दहा ठिकाणी एक लाखापेक्षा अधिक मते
पहिल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवारांचे खटके उडविले आहे. अनुकूल असलेल्या मतदार संघातही आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अनेक मतदार संघात तिसऱ्या ठिकाणी समाधान मानावे लागल्यानंतरही वंचित बहुजन आघाडीचे दहा उमेदवारांना एक लाखापेक्षा अधिक मते मिळाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com