मुख्यमंत्री म्हणतात, शेण अन् गोमुत्रामुळे अर्थव्यवस्था मजबूत होईल!

शेण आणि गोमुत्राकडे आर्थिक दृष्टीकोनातून पाहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
Shivraj Singh Chouhan
Shivraj Singh ChouhanFile Photo

भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांचे गाईचे शेण व गोमुत्रावर एक वक्तव्य समोर आलं आहे. गाईचे शेण व गोमूत्रामुळे राज्य व देशाची अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते, असं त्यांनी म्हटलं आहे. शेण आणि गोमुत्राकडे आर्थिक दृष्टीकोनातून पाहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

इंडियन वेटनरी असोसिएशनच्या महिला विभागाच्या संमेलनात चौहान बोलत होते. चौहान यांचा या वक्तव्याविषयीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्यांनी गाय व बैलाचे शेण आणि गोमुत्राचे महत्व सांगितले आहे. गाय आणि बैलाशिवाय काम होऊ शकत नाही. सरकारने अभयारण्य आणि गोशाळा बनवल्या आहे. पण त्याच्याशी समाज जोडला गेल्याशिवाय केवळ गोशाळा उघडून काम होणार नाही, असे चौहान म्हणाले.

Shivraj Singh Chouhan
आमच्याच मित्रपक्षातील लोकांनी घेतली कॉंग्रेसला बदनाम करण्याची सुपारी...

मध्य प्रदेशात लोकांमध्ये याविषयी जागृती करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगून चौहान म्हणाले, गाय, शेण आणि गोमूत्र यामुळे अर्थव्यवस्था मजबूत करू शकतो. देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवू शकतो. मध्य प्रदेशात स्मशान भूमीत लाकडं जाळली जाऊ नयेत, यासाठी आमचा प्रयत्न आहे. तिथे शेणापासून बनवलेल्या गोऱ्यांचा वापर करण्याचा प्रयत्न आहे, असेही चौहान यांनी सांगितले. याच कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पुरूषोत्तम रुपाला हेही उपस्थित होते. ते म्हणाले, गुजरातमधील ग्रामीण भागातील अनेक महिला गोपालनाशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे तेथील दुधव्यवसायात मोठे यश मिळाले आहे.

दिल्ली देशातील सर्वात प्रदुषित शहर

भारताची राजधानी दिल्ली (Capital Delhi) पुन्हा जगातील सर्वाधिक विषारी व प्रदूषित शहर (Polluted City) ठरले असून सर्वाधिक १० प्रदूषित शहरांत मुंबईचाही (Mumbai) समावेश झाला आहे. सर्वोच्च व उच्च न्यायालयाने (Supreme Court) अनुक्रमे केंद्र व दिल्ली सरकारकडून प्रदूषणाचा धोका कमी करण्याबाबतचा ठोस आणीबाणी कृती आराखडा मागितला आहे. ही हवा भयानक असून नागरिकांचा जीव वाचवायचा तर, पुन्हा लॉकडाऊन लावणे, वाहनांची गर्दी आवरणे व शाळा बंद ठेवणे यासारख्या सारख्या उपायांचा तत्काळ विचार करा, असे न्यायलयाने राज्य सरकारला सांगितले आहे.

दिल्लीत गेल्या २४ तासांत वायू गुणवत्ता सूचकांक (एक्यूआय) 556 अंकांच्या घातक पातळीवर पोहोचला. दिवाळीनंतर फटाके, नवीन बांधकामांमुळे उडणारी धूळ, लाखो वाहनांचा धूर व उत्तर प्रदेश, हरियाणासह शेजारच्या राज्यांतील शेतात काडीकचरा (पराली) जाळल्याने दिल्लीच्या हवेत मिसळणारा व विषारी बनणारा धूर यांचे प्रमाण सतत वाढत आहे. दिवाळीनंतर दिल्लीत सतत कुंद वातावरण आहे. धूर व धुके यांचे मिश्रण (स्मॉग) हवेत भरून राहिल्याने डोळे जळजळणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या समस्या दिल्लीकरांना सर्रास भेडसावत आहेत. लहान मुलांचे तर आरोग्यच धोक्यात असून दर तीनामागे दिल्लीच्या एका बालकाला अस्थमा व गंभीर श्वसनविकार घेऊनच पुढचे आयुष्य काढावे लागेल असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

भारतातील सर्वांत १० प्रदूषित शहरांत उत्तर प्रदेशातील ५ शहरांचा समावेश आहे. दिल्ली सरकारच्या उपायांनी प्रदूषण कमी होत नाही हे पाहिल्यावर न्यायालयाने पुन्हा यात हस्तक्षेप केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले असून, दिल्लीची हवा इतकी गंभीर झाली आहे की आता घरात मास्क वापरण्याची वेळ आली तरी तुमच्याकडे या प्रदूषणावर ठोस उपाय काय हे सांगत का नाही असा सवाल उपस्थित केला आहे. 'फक्त परालीची सबब तुम्ही का सांगता? त्यामुळे केवळ काही टक्के प्रदूषण होते, इतर कारणांचे व त्यावरील उपायांचे काय, असे सरन्यायाधीश रमणा यांनी तीव्रपणे विचारले. ही विषारी हवा किमान कमी व्हावी यासाठी तुमच्याकडे काय आराखडा आहे? एक्यूआयची पातळी कमी करायची तर दोन तीन नव्हे तर योग्य व ठोस योजना सांगा असेही न्यायालयाने फटकारले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com