मोदींना पत्र लिहून भाजपच्या मंत्र्याची तक्रार करणाऱ्या संतोष पाटीलचा संशयास्पद मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भाजपच्या कर्नाटकातील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची तक्रार करणाऱ्या संतोष पाटील यांचा मृतदेह आढळून आल्यानेे खळबळ उडाली आहे.
K S Eshwarappa with PM Narendra Modi
K S Eshwarappa with PM Narendra ModiSarkarnama

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे भाजपच्या (BJP) कर्नाटकातील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची तक्रार करणाऱ्या संतोष पाटील (Santosh Patil) यांचा मृतदेह आढळून आल्यानेे खळबळ उडाली आहे. त्यावरून आता राजकारण तापलं आहे. पाटील हे कंत्राटदार असून त्यांनी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री के. एस. ईश्वरप्पा (K. S. Eshwarappa) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे आता ते अडचणीत आले असून काँग्रेसने (Congress) त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

पाटील हे कंत्राटदार असून हिंदू युवा वाहिनीचे राष्ट्रीय सचिवही आहेत. उडपी येथील एका हॉटेलमध्ये मंगळवारी त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मागील काही दिवसांपासून ते बेपत्ता होते. बेळगावी पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात होता. दरम्यानच्या काळात पाटील यांनी त्यांच्या मित्रांना मेसेज केला होता. ईश्वरप्पा हे आपल्या मृत्यूला कारणीभूत असतील, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, असं पाटील यांनी म्हटलं होतं.

K S Eshwarappa with PM Narendra Modi
मोदी-योगींना जोरदार धक्का; वाराणसीत अपक्षाने केला भाजपचा पराभव

काय आहे प्रकरण? पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. ईश्वरप्पा यांच्या सांगण्यावरून आपल्या गावातील रस्त्याच्या कामासाठी चार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. पण त्यांनी खोटेपणा, भ्रष्टाचार, अनियमितता केली, असं पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ईश्वरप्पा यांना आपले बील देण्याचे सुचना द्याव्यात, अशी विनंती पाटील यांनी मोदींना केली होती.

आता पाटील यांनीच आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेसने या प्रकरणी थेट ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार म्हणाले, संतोष पाटील यांच्या मृत्यूविषयी समजले. हा खून असल्याचे सगळ्यांनाच माहित आहे. भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ईश्वरप्पा यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करायला हवा.

ईश्वरप्पा यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहे. संतोष पाटील याच्या मृत्यूशी आपला काही संबंध नाही. माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्याविरूध्द मी मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यांनी न्यायालयात लढा द्यायला हवा होता. मी त्यांना कधीच भेटलेलो नाही. त्यामुळे माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, असंही ईश्वरप्पा यांनी स्पष्ट केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com