पक्ष बदलणाऱ्या वानखेडेंना जनता जागा दाखवेल : हेमंत पाटील

पक्ष बदलणाऱ्या वानखेडेंना जनता जागा दाखवेल : हेमंत पाटील

हिंगोली : स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना व गद्दार उमेदवारांना शिवसैनिक व हिंगोलीतील सामान्य जनता आपली जागा दाखवून देईल, अशी जहरी टीका  शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार हेमंत पाटील यांनी केली. कॉंग्रेसकडून सुभाष वानखेडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली आहे 

मातोश्रीवरून उमेदवाराची घोषणा झाल्यानंतर पहिल्यांदाच हिंगोली शहरात हेमंत पाटील यांचे आगमन झाले होते हेमंत पाटील यांनी आज शिवसेना भाजपसह महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला. या मेळाव्यानंतर पाटील हे पत्रकारांशी संवाद साधत होते,

``गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुभाष वानखेडे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी वेळोवेळी पक्ष बदलला. शिवसेनेकडून ते दोनदा आमदार तर एकदा खासदार राहिले आहेत. पक्षाने एवढ्या वेळेस त्यांना काम करण्याची संधी देऊन देखील त्यांनी पक्षासोबत गद्दारी केली आहे आणि आता पुन्हा भाजपचे असलेल्या सुभाष वानखेडे यांनी काँग्रेसचा झेंडा हातात घेऊन हिंगोली लोकसभेची निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र जनता सुज्ञ आहे. सर्वसामान्य जनता व शिवसैनिक या गद्दारांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय स्वस्त बसणार असल्याचे पाटील यांनी सांगितले

दरम्यान हेमंत पाटील यांच्या टीकेला सुभाष वानखेडे कशा पद्धतीने उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com