कागल (कोल्हापूर) : "माझ्या आजवरच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत मुंबईकर ग्रामस्थांचे योगदान मोठे आहे', अशी भावना आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
मुंबईतील ना. म. जोशी स्कूलमध्ये आयोजित मुंबईकर ग्रामस्थांच्या मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. माजी मंत्री सचिन अहिर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
आमदार मुश्रीफ म्हणाले, ""जिल्ह्यातील मुंबईकर ग्रामस्थांसाठी कोल्हापूर भवन बांधणार आहोत. मुंबईकर ग्रामस्थांना मागेल त्याला साखर कारखान्याचे सभासदत्व देऊ.''
सचिन अहिर म्हणाले, "आमदार हसन मुश्रीफ हे राज्याचे नेते आहेत. त्यांचे काम प्रचंड आहे. त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा खऱ्या अर्थाने समर्थपणे चालविला आहे.''
मेळाव्याचे नियोजन बाळासाहेब गुजर, अरुण पाटील, अमृत साळुंखे, दत्ताजी तानवडे, टी. एस. देसाई आदींनी केले होते.
स्वागत बाळासो गुजर यांनी तर प्रास्ताविक निवृत्ती देसाई यांनी केले. कार्यक्रमास मुंबई जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक विठ्ठलराव भोसले, बी. एन. देसाई यांची भाषणे झाली. आभार बाजीराव पाटील यांनी मानले. सुरेश चिकणे यांनी सूत्रसंचालन केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.