कोल्हापूर : राज्यात नव्याने आलेले हे सरकार बहुजनांचे असून ते आणण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केले.
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीचे लोकार्पण श्री. पवार यांच्या हस्ते आज झाले. कार्यक्रमाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील आदि यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, ''राजर्षी शाहू महाराजांची जन्मशताब्दी 1974 साली झाली, त्यावेळीही श्री. पवार कार्यक्रमाला उपस्थित होते. आज त्यांच्या उपस्थितीत महाराजांच्या समाधीचा लोकार्पण सोहळा होत आहे. शाहू महाराजांनी कष्टकरी, दिनदुबळ्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे.''
नव्या सरकारबाबत बोलताना शाहू महाराज म्हणाले, "राज्यात नव्याने आलेले सरकार हे बहुजनांचे आहे आणि ते आणण्यात श्री. पवार यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच जिल्ह्याला तीन तीन मंत्रीपदे मिळाली आहेत ही चांगली गोष्ट आहे. त्यातून जिल्ह्याच्या विकासाला संधी मिळणार आहे.''
शाहू महाराजांचे भक्त जास्त आहेत, पण त्याऐवजी त्यांचे अनुयायी झाले पाहीजेत. महाराजांनी जो समतेचा विचार दिला तो सर्वदूर नेण्याचे काम या अनुयायांनी केले पाहीजे, असेही श्रीमंत शाहू महाराज म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.