सांगली : जसा शरद पवारांवर गुन्हा दाखल झाला तसा चार कारखान्यांना 200 कोटींचा पतपुरवठा करण्यासाठी हमी देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरसुद्धा गुन्हा दाखल झाले पाहिजे, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे .
शिरोळ येथे राजू शेट्टी पत्रकारांशी बोलत होते . श्री. शेट्टी पुढे म्हणाले, ईडीच्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो .राज्य बँकेत झालेल्या घोटाळ्याबद्दल नक्की कारवाई झाली पाहिजे या मताशी मी सहमत आहे.
त्यामुळे जसा पवारांवर गुन्हा दाखल झाला तसा चार कारखान्यांना 200 कोटींचा पतपुरवठा करण्यासाठी हमी देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर सुद्धा गुन्हा दाखल झाले पाहिजे . यासाठी लवकरच उच्च न्यायालयात आपण याचिका दाखल करणार असल्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
राज्य सहकारी बँकेच्या संचालकांवर गुन्हा दाखल झाला असला तरी ज्यांनी कर्जे घेतली ते मोकाटच आहे. असे कर्ज घेतलेले अनेक लोक सध्या भाजपामध्ये प्रवेश केलेलं आहेत त्यामुळे या भाजपावासींवर ईडी कारवाई करणार का ? असा सवालही राजू शेट्टींनी उपस्थित केला.
याचबरोबर चार कारखान्यांना 200 कोटींचा पतपुरवठा करण्याची हमी घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागनीही राजू शेट्टी यांनी केली. ईडीकडून निवडणुकीच्या वातावरण निर्मितीपोटी अशी कारवाई केली जात असल्याचा टोलाही राजू शेट्टी यांनी लगावला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.