Nana Patole On BJP News : सरकार आपलीच पाठ आपण थोपटून घेतयं, आता जनतेने विचार करावा..

Congress News : कॉंग्रेस हा नेत्यांचा नव्हे तर जनतेचा पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.
Congress President Nana Patole News
Congress President Nana Patole NewsSarkarnama
Published on
Updated on

Aurangabad Political News : भाजपप्रणीत ईडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. तरूणांना रोजगार नाही आणि महागाईने सामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. सध्याचे सरकार बधीर असून आपलीच पाठ आपण थोपटून घेत असल्याचा, आरोप काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. (Nana Patole On BJP News) आता याचा जनतेने विचार करायचा आहे. याविषयी लोकांमध्ये जागृती करण्यासाठी लोकांमध्ये जाणार आहोत, त्याची सुरवात छत्रपती संभाजीनगर येथून करत असल्याचे पटोले म्हणाले.

Congress President Nana Patole News
Ambadas Danve On Amit Shah: शाहांसमोर हात चोळत, मान खाली घालून महाराष्ट्राला पुढे नेणार का ?

पटोले (Nana Patole) आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सुभेदारी विश्रामगृहात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शेतकऱ्यांकडे हे सरकार लक्ष देत नाही, अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानीची अजून मदत दिली जात नाही. (Congress) बोगस बियाणे देवून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे, भाजपप्रणित ईडी सरकारच्या काळातच सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत.

बेरोजगारांना रोजगार नाही, महागाईने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे मात्र महागाई नसल्याचे सांगून सरकार सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याची टीका पटोले यांनी केली. रोहिणी आयोगाच्या शिफारशींच्या माध्यमातून ओबीसींना आपसात लढवण्याचे काम केले जात आहे, भावाभावात भांडणे लावली जात आहेत. (Marathwada) जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे ही कॉंग्रेसची भुमीका आहे.

तरच बहुजनांचा अर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास होईल, मात्र बहुजनांचा विकास होऊ नये ते आपसात भांडत रहावेत हेच भाजपचे धोरण असल्याचे असल्याचा आरोपही पटोले यांनी केला. याविषयी राज्यात आम्ही जनजागृती करणार आहोत आणि याची सुरवात येथून करत आहोत. कॉंग्रेस हा नेत्यांचा नव्हे तर जनतेचा पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कॉंग्रेसमुक्त करायला निघालेले, कॉंग्रेसला संपवायला निघालेले लोकच संपत असल्याचा टोला पटोले यांनी विरोधकांना लगावला.

राष्ट्रवादीत काय सुरू आहे तो त्यांचा अंतर्गत विषय आहे, आम्हाला राज्यातील जनतेची काळजी आहे. जनतेच्या प्रश्नांवर कॉंग्रेसचे लक्ष असून आमची लढाई हुकूमशाही व्यवस्थेविरूद्ध असल्याचे पटोले म्हणाले. प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेवर लोकसभा निवडणुका माझ्याच नेतृत्वात होतील, असे स्पष्ट करत पटोलेंनी बदलाची चर्चा फेटाळली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com