रत्नागिरी : त्या मातोश्रीवरच्या माऊलीने, रश्मी वहिनींनी तुम्हाला स्वत:च्या हाताने करुन खायला घातलं उदय सामंत. त्यांनी काय पाप केलं होत. काही चूक केली होती का त्यांनी. काय चुक केली उद्धव साहेबांनी, असे सवाल करत शिवसेनेचे सरचिटणीस, खासदार विनायक राऊत यांनी बंडखोर आमदार उदय सामंत यांना केले. रत्नागिरीत शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात राऊत बोलत होते.(Shivsena Latest Marathi News)
सात वर्षातलं तुमचं शिवसेनेतील आयुष्य, चार वर्षांत तुम्हाला म्हाडाचं मंत्रीपद दिलं. खोऱ्याने ओढलं, फावड्याने ओढलं, त्यांनी कधी विचारलं नाही, असा टोलाही विनायक राऊत यांनी लगावला. आदित्य ठाकरे यांनी उदय सामंत यांना सर्वात जास्त जवळ केले. किमान आदित्य यांनी भरवलेल्या फ्रँकीची आणि अन्नाची तरी किंमत ठेवायची होती, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.(Political News updates)
आज काहीजण शिवसेनेचा बाण हिसकावून घेण्याची भाषा करत आहेत. पण शिवसेनेचा धनुष्य बाण हिसकावून घेणारी औलाद अजून जन्माला आली नाही आणि येणारही नाही, असा हल्लाबोल राऊत (Vinayak Raut) यांनी केला. प्रत्येक बंडखोर आमदाराने 50 ते 60 खोके घेतले, शिवसेना संपवण्याचे भागीदार झाल्यास तुमची जागा नरकात असेल. तुमच्या जाण्याची आम्हाला किंमत नाही. पण यापुढे कोणत्याही गद्दाराला शिवसेनेमध्ये प्रवेश मिळणार नाही, असे म्हणत राऊतांनी उदय सामतांना खडसावले.
आम्हाला निधी मिळाला नाही असा तुम्ही आरोप केला. पण रत्नागिरीच्या विमानतळाला उद्धव ठाकरेंनी शंभर कोटींचा निधी दिला. पण गेल्या वर्षभरात एननाथ शिंदेंना ३६६ कोटी, उदय सामंत यांना २२१ कोटींचा निधी दिला पण खायंच आणि त्याच ताटात घाण करायची अशी औलाद. जाता जाता उद्धव ठाकरेंचे आभार मानण्याऐवजी तुम्ही बोटं मोडून गेले, आता आम्हालाही तुमची किमंत नाही, असा शब्दांत विनायक राऊत यांनी उदय सामंत यांच्यावर टीकास्त्र डागले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.