
औरंगाबाद : अडीच वर्षापुर्वी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. कल्याण काळे यांनी शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना हाताशी धरून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महाविकास आघाडीला मिळावे अशी मागणी केली. (Aurangabad) स्थानिक नेत्यांनी ती मान्यही केली, पण राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वेगळी खेळी करत देवयाणी डोणगावंकर यांनाच पुन्हा अध्यक्ष करण्याच्या हालचाली सुरू केल्या.
त्यांच्या प्रयत्नांना यशही आले होते, पण शेळके आणि डोणगावंकर या दोघींनाही समसमान मते पडली आणि ईश्वर चिठ्ठीवर शेळके यांची लाॅटरी लागली. (Bjp) मीना शेळके यांनी अडीच वर्ष अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. (Congress) पण जिल्हा परिषदेची मुदत संपून आता निवडणुका जाहीर होणार तोच शेळके यांनी भाजपमध्ये प्रवेश करत काॅंग्रेसला धक्का दिला.
भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेळके व त्यांचे पती रामराव शेळके यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काॅंग्रेस विशेषत: जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांना धक्का समजला जातो. विधानसभेसाठी काळे यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या बागडे यांच्या नेतृत्वाखाली झालेला हा प्रवेश म्हणजे नानांचीच खेळी असल्याची चर्चा या निमित्ताने जिल्ह्यात सुरू झाली आहे.
काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मीना शेळके यांनी पत्रकार परिषदेत भाजपात प्रवेश केल्याची घोषणा केली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर फुलंब्री तालुक्याचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामराव शेळके त्यांच्या पत्नी मीना शेळके यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.