Chandrakant Patil : महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्याला जमीनदोस्त करत आहे..

अर्धवट कर्जामाफी, नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान न देणे, अशी या सरकारची शेतकरी विरोधी कृत्य आहेत. (Chandrakant Patil)
Bjp Leader Chandrakant Patil
Bjp Leader Chandrakant PatilSarkarnama

औरंगाबाद : राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे शेतकरी विरोधी आहे, वारंवार शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेऊन त्यांना जमीनदोस्त करण्याचे काम या सरकारकडून सुरू असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे.

एका ट्विटच्या माध्यमातून पाटील यांनी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या एफआरपीचे तुकडे करत सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप केला आहे. (Bjp) राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल औरंगाबादेत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर निशाणा साधला होता.

आमची सत्ता असतांना पाच वर्षाच्या काळात आम्ही एकाही शेतकऱ्यांची वीज तोडली नाही, पण महाविकास आघाडी सरकार सर्रास शेतकऱ्यांची वीज तोडत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर एफआरपीच्या निर्णयावरून आता चंद्रकांत पाटील यांनी देखील महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी एक ट्विट केले असून, त्यात ते म्हणतात, वारंवार शेतकरी विरोधी कृत्य करणारे मविआ सरकार आता एफआरपीचे तुकडे करून शेतकऱ्यांना जमीनदोस्त करत आहे ! महाविकास आघाडी सरकार हे पुर्णपणे शेतकरी विरोधी आहे.

Bjp Leader Chandrakant Patil
Imtiaz Jaleel : बांधकाम सभापतीने पाच टक्के कमिशन मागितले; मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी..

अर्धवट कर्जामाफी, नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान न देणे, अशी या सरकारची शेतकरी विरोधी कृत्य आहेत. आता एफआरपीचे दोन तुकडे करून हे सरकार शेतकऱ्याला जमीनदोस्त करत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com