सोलापूर : मागच्या अडीच वर्षात महावसुली सरकार सत्तेत होते, त्यामुळे काही मंत्र्यांना जेलमध्ये जावं लागलं. काही मंत्र्यांचे अतिरेक्यांशी संबंध होते, त्यांनाही जेलवारी करावी लागली आहे. विशेष म्हणजे सकाळी नऊ वाजता येणार बांग देणारा पण आता जेलमध्ये गेला आहे, अशा शब्दांत सोलापूर नूतन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी देशमुख, मलिक आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले. (Radhakrishna Vikhe Patil's criticism of Sanjay Raut)
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. पंढरपुरातून त्यांनी आपल्या सोलापूर जिल्हा दौऱ्याला सुरुवात केली. पंढरपुरात राष्ट्रवादीचेही काही नेते त्यांना भेटायला आले होते. सोलापुरात पत्रकार परिषदेत विखे पाटील बोलत होते.
पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत मागच्या महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मागच्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकार नसून महावसुली सरकार सत्तेत होतं. त्या सरकारच्या मंत्र्यांना जेलमध्ये जावं लागलं. काही मंत्र्यांचा अतिरेक्यांशी संबंध होता, त्यामुळं त्यांनाही जेलमध्ये जावं लागलं, तर सकाळी नऊ वाजता येऊन बांग देणारा पण आता जेलमध्ये आहे, असं म्हणतं विखे पाटील यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री नवाब मलिक आणि शिवसेना खासदार संजय राउत यांच्यावर नाव न घेता तोफ डागली.
दरम्यान, मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्तपण जेलमध्ये आहेत. आणखी किती लोक जेलमध्ये जातील सांगता येत नाही, असं म्हणत विखे पाटलांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना सूचक इशारा दिला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.