

पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांची दिल्लीत बदली करण्यात आली आहे. सदस्य रेल्वे बोर्ड पायाभूत सुविधा पदावर विवेक कुमार गुप्ता यांची बदली झाली आहे. गुप्ता यांच्याकडे मध्य रेल्वेचा देखील अतिरिक्त कार्यभार होता. तत्कालीन महाव्यवस्थापक विजय कुमार यांच्या मृत्यूनंतर गुप्ता यांच्याकडे मध्य रेल्वेची देखील जबदारी देण्यात आली होती. गुप्ता यांच्या जागी मध्य व पश्चिम रेल्वेची जबादारी कुणाला मिळणार हे पाहणे महत्वाचे आहे. गुप्ता यांच्या बदलीमुळे तूर्तास दररोज 60 लाख प्रवासी संख्या असलेल्या उपनगरीय रेल्वेचे महाव्यवस्थापकपद रिक्त आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नागरी उडयन मंत्रालयाला पाठवले होते. मंत्री राममोहन नायडू यांनी त्याला उत्तर दिले आहे. चौकशी करून अहवाल सादर केला जाईल, असे सांगितले आहे. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅकबॉक्स मिळाला असून त्याद्वारे तपास सुरू झाला आहे. या ब्लॅकबॉक्समध्ये वैमानिकाच्या किंचाळण्याचा आवाज येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. वैमानिकांनी मीड डे कॉल दिला नसल्याचे समोर येत असल्याचे सांगितले जात आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची इच्छा होती. अंकुशराव, तुम्ही शरद पवारसाहेबांशी बोला, असे दादांनी म्हटले होते. आम्ही आमच्याकडून शक्य होतील तेवढे प्रयत्न केले होते. पण त्याला दुर्दैवाने यश येऊ शकले नाही, अशी खंत अकुंश काकडे यांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. म्हणजे आता सात फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर नऊ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. पूर्वी पाच फेब्रुवारीला मतदान होणार होते, तर सात फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
दिल्लीतील कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनी झालेल्या संचालनात महाराष्ट्राचा चित्ररथ अव्वल ठरला आहे. यंदा महाराष्ट्राने गणेशोत्सवाचा चित्ररथ साकारला होता. या गणेशोत्सवाच्या चित्ररथाला पहिला, तर जम्मू काश्मीरच्या चित्ररथाने दुसरा आणि केरळच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळाला आहे.
चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापनेवरून प्रचंड स्पर्धा दिसून येत आहे, त्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरातील काँग्रेस नगरसेवकाला जीवे मारण्याचा धमकी देण्यात आली आहे. पुण्याहून चंद्रपूरकडे निघालेले काँग्रेसचे नगरसेवक राजेश अरोरा असलेली ट्रव्हल्स अडवून त्यांना ही धमकी देण्यात आली आहे. ही घटना गणेशपुरा शिवारात घडली आहे. या प्रकरणी सावंगी पोलिस ठाण्यात १७ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. एकाला ताब्यात घेतले आहे.
वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करावी, समुद्राला वाहून जाणारे पाणी स्थानिकांसाठी तसेच महाराष्ट्रातल्या कोरडवाहू भागासाठी वापरावे, पेसा भरती सुरू करून रोजगार उपलब्ध करावा, आदी मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने काढलेल्या लाँग मार्चच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वर्षा या निवासस्थानी मंगळवारी सकारात्मक चर्चा झाली. हा मोर्चा काल मुंबईच्या सीमेवर भातसा नगर फाटा येऊन धडकला होता.
पुण्यातील वाघोली परिसरात काल दुपारी एक धक्कादायक घटना घडली. ३० ते ४० विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याने रस्त्यावर चार दुचाकी आणि एका कारला धडक दिली. काही वाहने थोड्या अंतरापर्यंत फरफटत गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक नागरिकांनी तत्काळ हस्तक्षेप करत चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
अमरावती महानगरपालिकेत भाजपच्या गटनेतेपदी माजी महापौर चेतन गावंडे यांची निवड करण्यात आली आहे. साईनगर प्रभागातून ते सलग दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या अनुभव आणि नेतृत्वक्षमतेवर पक्षाने विश्वास दाखवला आहे. गावंडे यांच्या निवडीमुळे मनपातील भाजपची संघटनात्मक ताकद वाढेल, असा विश्वास राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. नाशिक जिल्ह्यातही वातावरण अत्यंत भावूक झाले आहे. अजित पवार यांना मानणारा मोठा वर्ग नाशिकमध्ये असल्याने जिल्हा बाजार समिती आज दिवसभर बंद ठेवण्यात आली. सर्व लिलाव आणि व्यवहार स्थगित ठेवून बाजार समितीच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अनेक गावांमध्ये नागरिकांनी दैनंदिन व्यवहारही बंद ठेवले.
भारतीय महसूल सेवा विभागाचे अधिकारी समीर वानखेडे यांनी शाहरुखानच्या प्रोडक्शन हाऊस आणि सिरीजविरोधात केलेल्या मानहानी खटल्याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. समीर वानखेडे यांनी अभिनेता शाहरूख खानच्या प्रोडक्शन बॅनर रेड चिलीज एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि स्ट्रीमिंग जायंट नेटफ्लिक्सविरोधात मानहानाची याचिका केली होती. द बॅड्स ऑफ बॉलिवूड या वेब सिरीजमधील भूमिकेवरून ही याचिका करण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल अपघाती निधन झाले. या निधनाची बातमी समजताच शोकाकुल वातावरणात दुपारी सर्वपक्षीय चिखली बंदची हाक देण्यात आली होती. या हाकेला प्रतिसाद देत आज व्यापारी बांधवांनी चिखली बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला असून शहरात शांतता पसरली आहे. फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यात आली आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण :
1. नियमात वापरल्या गेलेल्या शब्दांवरून असे सूचित होते की या नियमाचा गैरवापर होऊ शकतो.
2. आम्ही समाजात एक निष्पक्ष आणि समावेशक वातावरण निर्माण करण्याचा विचार करत आहोत.
3. जेव्हा ३ ई आधीच अस्तित्वात आहेत, तेव्हा २ सी कसे प्रासंगिक होतात?
4. सरन्यायाधीश : आम्ही २०१२ चे नियम पुन्हा लागू करण्याचा आदेश देतो.
5. पुढील सुनावणी : १९ मार्च
राष्ट्रवादीचे नेते राज्याचे उमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे काल विमान दुर्घटनेत निधन झाल्याने संपुर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. अजितदादांच्या निधनाने यवतमाळच्या ढाणकी शहरात बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभामध्ये आर्थिक सर्वेक्षण 2025–26 सादर केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा पार्थ पवार आणि जय पवार यांनी वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नि दिला. थरथरत्या हातांनी आणि भरलेल्या डोळ्यांनी अजित पवार यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नि दिला. यावेळी दोन्ही मुलांना रडू कोसळलं. दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी यावेळी लाखोंच्या संख्यने जनसमुदाय जमला होता.
आज बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. दादांना निरोप देताना बारामतीकर व अवघ्या महाराष्ट्रातून आलेले समर्थक गहिवरले. मुलगा पार्थ पवार व जय पवार यांनी अजितदादांच्या पार्थिवाला
आपल्या लाडक्या दादाला अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत लाखोंचा जनसमुदाय जमला आहे. अजित पवार अमर रहे च्या घोषणा दिल्या जात आहेत. दादा परत या… दादा परत या… अशाही घोषणा दिल्या जात आहे.
चंद्रकांत पाटील गणेश नाईक, पंकजा मुंडे, विजयकुमारे गोरे, संजय राठोड, रितेश देशमुख, राजेंद्र गवई, रामदार आठवले यांच्याकडून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी घेतले अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. गेल्या काही काही दिवसांपासून छगन भुजबळ आजारी आहेत. पण तरीही काल त्यांनी अपघातस्थळी जाऊन भेट दिली होती.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली असून आपल्या लाडक्या व दमदार सहकाऱ्याला अखेरचा निरोप दिला आहे. मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यासह अनेक दिग्गज नेते अजितदादांना श्रद्दांजली अर्पण करत आहेत.
जड अंत:करणाने पवार कुटुंबाने अंत्यविधी प्रक्रियेला सुरुवात केली आहे. काही वेळातच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. बारामती मधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मोठा जनसमुदाय या ठिकाणी जमला आहे. दादांना निरोप देण्यासाठी प्रचंड गर्दी झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीत दाखल झाले आहेत.
अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीत पोहचले आहे. बारामती मधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी बारामतीत दाखल झाले आहेत.
अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर उसळला, थोड्याच वेळात विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार केले जाणार
काटेवाडीत अजित पवारांना शासकीय मानवंदना. पार्थिव आता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आणलं जाणार.
अजित पवारांच्या अंतिम संस्कारासाठी अभिनेता रितेश देशमुख काटेवाडीत पोहोचले
अजित पवारांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा न काढता ते थेट विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर नेलं जाणार आहे.
मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात दाखल झाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पार्थिव सध्या काटेवाडीत अंत्यदर्शनासाठी ठेवलं आहे. तर आता शरद पवार देखील काटेवाडीतील निवासस्थानी दाखल झाले आहेत.
पुढील अर्धा तासाच्या आत अजित पवार यांचे पार्थिव थेट विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात नेलं जाणार आहे. ११ वाजता अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्ययात्रा न काढता अजित पवारांचे पार्थिव थेट मैदानावर नेले जाणार आहे. अंत्यसंस्काराचे सगळे विधी मैदानात संपन्न होणार असून यावेळी पोलिसांकडून मानवंदना देण्यात येईल त्यानंतर अजित दादा यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात येईल.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुळगाव असलेल्या काटेवाडी येथे अजित पवारांचे पार्थिव नागरिकांना अंतिम दर्शन घेण्यासाठी ठेवलं आहे. शिवाय सध्या संपूर्ण पवार कुटुंबिय काटेवाडीत दाखल झाले आहेत. तर अजित पवारांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी काटेवाडीतील निवासस्थानी हजारो नागरिकांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधीसाठी देशभरातली अनेक दिग्गज नेते बारामतीत येणार आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी बारामती विमानतळावर पोलिसांचं पथक आणि NDRF पथकाला पाचारण करण्यात आलं आहे. अत्यंविधीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीएसओ विदीप जाधव यांच्यावर रात्री उशिरा फलटण जवळच्या तरडगाव या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पार्थिव काटेवाडीतील निवासस्थानी दाखल करण्यात आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.