Bhanudas Murkute On Radhakrishna Vikhe : भानुदास मुरकुटे संतापून म्हणाले, 'मंत्री विखेंचा कारभार 'मोहम्मद तुघलकी' तर, आमदार कानडे 'बेजबाबदार'

Bhandardara dam water : भंडारदरा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा अपव्यय झाल्याच्या आरोप करत माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या कारभारावर संताप व्यक्त केला.
Bhanudas Murkute - Radhakrishna Vikhe
Bhanudas Murkute - Radhakrishna VikheSarkarnama

Shrirampur News : भंडारदरा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा अपव्यय झाल्याच्या आरोप करत माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या कारभारावर संताप व्यक्त केला. मंत्री विखे यांच्या कारभाराला 'मोहम्मद तुघलकी' असे म्हणत तर, स्थानिक आमदार लहू कानडे यांना 'बेजबाबदार लोकप्रतिनिधी' म्हणून माजी आमदार मुरकुटे यांनी चांगलेच सुनावले.

माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी श्रीरामपूर भागाला पुरेसे पाणी न मिळाल्याने भाजप (BJP) नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. भंडारदरा धरण लाभक्षेत्रातील उन्हाळ्यातील पाटपाण्याचे व्यवस्थापन म्हणजे 'मोहम्मद तुघलकी' कारभाराचा उत्तम नमुना आहे. पाटपाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाटबंधारे विभागाला संपर्क साधला. पण भंडारदरा धरणाचे उन्हाळी आवर्तनाचा खेळखंडोबा करून श्रीरामपूर भागातील शेतकऱ्यांच्या ऊसाला पाणी न मिळाल्याने उभी पिके उद्ध्वस्त झाली आहे. असे अन्यायकारक प्रकार तत्काळ थांबवावेत, अशी मागणी भानुदास मुरकुटे यांनी केली.

उन्हाळ्याच्या पाटपाण्याच्या बाबतीत श्रीरामपूर परिसरातील अशोक कारखान्याच्या परिसरावर अन्याय झाल्याचे निदर्शनास येते. तुलनेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी त्यांच्या प्रवरा परिसराच्या कार्यक्षेत्रातील उभ्या पिकांना काही ठिकाणी दोनदा पाणी दिले गेले. मात्र श्रीरामपूर अशोक कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस पिके पाण्याअभावी उद्ध्वस्त झाली. यामागे पालकमंत्री विखे यांचा अशोक कारखाना बंद पाडण्याचा डाव असल्याचा, आरोप माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केला.

Bhanudas Murkute - Radhakrishna Vikhe
Ahmednagar Lok Sabha Exit Poll 2024 : एक्झिट पोलविरोधात? मंत्री राधाकृष्ण विखेंचा पुत्र सुजयसाठी 'आशीर्वाद' आणि 'मार्गदर्शना'वर भरवसा!

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दादा भुसे यांची मुंबईत भेट घेऊन भंडारदरा धरणाचे डाव्या कालव्याला पाणी अतिशय कमी प्रमाणात पाणी मिळत असल्याकडे लक्ष वेधले होते. यानंतर पाणी सोडण्यात आले. परंतु पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणून कमी दाबाने पाणी सोडले. परिणामी श्रीरामपूर परिसरातील बहुतांशी शेतकरी पाटपाण्यापासून वंचित राहिली. भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या बाबतीत श्रीरामपूर तालुक्यावर अन्याय होत असताना तालुक्याचे आमदार महाशय, यावर एक शब्दही बोलायला तयार नाहीत, अशा शब्दात मुरकुटे यांनी आमदार लहू कानडे यांचे नाव घेता सुनावले.

Bhanudas Murkute - Radhakrishna Vikhe
Exit Polls Result 2024 : एकनाथ खडसेंना रोखण्याची तावडेंची खेळी यशस्वी ?

आमदार कानडेंचे बंधू बैठका घेतात...

स्थानिक लोकप्रतिनिधींची मोठी जबाबदारी असते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमीच दक्ष असावे लागते. मात्र श्रीरामपूर तालुक्यातील आमदार यांनी शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी आमदार लहू कानडे यांच्यावर केला. आमदार कानडे यांच्यापेक्षा त्यांच्या बंधूंची यात काही प्रमाणात लुडबुड दिसली. त्यांचे बंधू आमदार नसताना देखील सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठका घेत सूचना देत असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केला.

(Edited by : Chaitanya Machale)

Bhanudas Murkute - Radhakrishna Vikhe
Ahmednagar Lok Sabha Exit Poll 2024 : खासदार विखेंना धक्का बसणार, लंके आघाडीवर राहणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com