Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पाहतायेत अजित पवारांच्या उत्तराची वाट!

Nagpur winter Session : मुख्यमंत्री शिंदे शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरवत असल्याची टीका
Ajit pawar, Uddhav Thackeray Devendra fadnavis
Ajit pawar, Uddhav Thackeray Devendra fadnavissarkarnama

Political News : नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्यापासून भाजपमध्ये अस्वस्थता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिकांच्या बाबत नाराजी कळवली. मात्र, अजित पवार या पत्राला काय उत्तर देतायेत याची आपण वाट पाहतोय, या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांची फिरकी घेतली.

नागपूरात अधिवेशासाठी उपस्थित असलेल्या उद्धव ठाकरेंनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्या हल्ला चढवला. शेजारी बसून देखील फडणवीसांना अजित पवारांना पत्र लिहावे लागत असेल तर अवघड आहे. आम्ही भाजपसोबत सत्तेत असताना नरेंद्र मोदी म्हणाले की काही लोक `मिर्ची`सोबत व्यापार करतात. त्यांचा रोख प्रफुल पटेलांवर होता. मग आता सत्तेचा हा व्यापार करणार का? नवाब मलिकांना एक न्याय आणि प्रफुल पटेलांना एक न्याय का? असा सवाल ही ठाकरे यांनी उपस्थित केला.

Ajit pawar, Uddhav Thackeray Devendra fadnavis
Bharat gogawale : मंत्रिपदाच्या बातम्या ऐकल्यावर भरत गोगावलेंच्या मनात लाडू फुटतात!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील ठाकरेंनी सडकून टीका केली. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरवून समुद्र किनारी ट्रॅक्टर चालवतात. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. कर्जमाफी जाहीर करून त्याची अंमलबजावणी केली. मात्र, अवकाळीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना मात्र,हे सरकार त्यांच्याकडे पाहत नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उदासीन आहेत. विमा कंपन्या देखील शेतकऱ्यांना छळत असल्याचे ठाकरे म्हणाले.

Ajit pawar, Uddhav Thackeray Devendra fadnavis
Nagpur Winter Session : पडळकरांचे एकच मिशन, धनगरांना मिळावे आरक्षण!

भाजप निवडणुक प्रचारात धर्माचा वापर करते. त्यामुळे धर्माच्या नावावर मते मागण्यास मोकळीक आहे का? असे पत्र निवडणुक आयोगाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडून लिहले होते. त्या पत्राच्या उत्तराची आपण वाट पाहत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच आरक्षण प्रश्नावर पुन्हा आपली भुमिका ठाकरे यांनी स्पष्ट केली. ज्या समुहांना आरक्षणाची गरज आहे. त्यांना आरक्षण देण्यात यावे. मात्र, दुसऱ्याच्या आरक्षणाला धक्का न लावता तो निर्णय घेतला पाहिजे, असे ठाकरेंनी सांगितले.

370 कलम हटवण्यासाठी शिवसेनेचा आग्रह होता. आम्ही केंद्र सरकारसोबत सत्तेत असताना तो निर्णय घेतला गेला होता. तो न्यायालयाने कायम ठेवला आहे.त्याचा आम्हाला आनंद आहे. आता पाकव्याप्त काश्मिर घेऊन संपूर्ण जम्मू कश्मिरमध्ये निवडणूक घ्या, असे आव्हान देखील ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना दिले.

Edited by Roshan More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com