भाजप विरोधात कॉंग्रेसचे सामाजिक परिवर्तन अभियान : सागर कलाने 

भाजप विरोधात कॉंग्रेसचे सामाजिक परिवर्तन अभियान : सागर कलाने 

शेगाव : राज्यातील भाजप सरकारच्या गेल्या तीन वर्षाच्या काळात दलित समाजावर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. ऑनलाइनमुळे अनेक योजना बंद पडत असून त्याचा परिणाम विद्यार्थी, शेतकरी आदी वर्गांवर होत आहे. शासनाच्या या धोरणाविरोधात जनजागृती करण्यासाठी कॉंग्रेसने सामाजिक परिवर्तन अभियान सुरु केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे अमरावती अध्यक्ष सागर कलाने यांनी दिली. 

शेगाव येथे येऊन संत गजानन महाराजांना भाजप सरकारला मागासवर्गीयांचे कल्याण करण्याची सद्धबुद्धी देवो असे साकडे घातले असल्याचे त्यांनी सांगीतले. भाजप सरकारने गेल्या तीन वर्षात 356 योजना बंद पाडून दलित,आदिवासी, समाजाचे नुकसान केले. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती देखील बंद करून या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले आहे. भाजपने मागासवर्गीयांना उच्च शिक्षित होऊ द्यायचे नाही असे षडयंत्र रचले आहे. शेतकरी कर्जमाफीचाही असाच खेळ सुरू आहे. भाजप सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यांवर सोडून दिले आहे. सरकारच्या या धोरणा विरोधात जनजागृती करण्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे. 

या अभियानाच्या माध्यमातून दलित,आदिवासी, व इतर मागासवर्गीयांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. सध्य राज्यात कॉंग्रेसतर्फे जन आक्रोश आंदोलन सूरू आहे, अमरावती विभागात 7 ऑक्‍टोंबर रोजी सायन्सकोर मैदानावर दुपारी 2 वाजता जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती सागर कलाने यांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com