केंद्राचे कृषी विधेयक शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारे : पृथ्वीराज चव्हाण

२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असं मोदी म्हणाले होते पण शेतकऱ्यांना सध्या हमीभावही मिळत नाही. हा काळा कायदा पुन्हा सरकारला पाठवून फेरविचार करायची मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे. शेतकरी विरोधी कायदे केंद्र सरकार मागे घेत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहिल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Congress Leader Prithviraj Chavan
Congress Leader Prithviraj Chavan

कऱ्हाड : मोदी सरकारने घाई गडबडीत तीन शेतकरी विरोधी कृषी विधेयके मंजूर करून घेत लोकशाहीचा गळा घोटला आहे. हे शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारे विधेयक असून मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांनाच याचा फायदा होणार आहे. त्यामुळे हे शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे सरकार नसून हे सूट बूट वाल्यांचे सरकार आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापूर येथील डिजिटल रॅलीमधून केली.

काँग्रेस पक्षाकडून ही डिजिटल रॅली महाराष्ट्रातील सहा प्रमुख शहरातुन आयोजित केली होती. कऱ्हाड तालुक्यात सुद्धा या रॅलीचे आयोजन केले गेले. तालुक्यातील मलकापूर, कऱ्हाड, विंग, काले, येळगाव जिल्हा परिषद गट, वाठार, रेठरे खुर्द, रेठरे बुद्रुक, वारुंजी, कोपर्डे, मसूर, पाल व उंब्रज विभागातून शेतकरी बचाव डिजिटल रॅलीचे आयोजन केले होते. 

याप्रसंगी राज्यातील सहा प्रमुख शहरांतुन या डिजिटल रॅलीप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री श्री. चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, ऊर्जामंत्री नितीन राऊत, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम आदी नेत्यांनी मार्गदर्शन केले. 

श्री.चव्हाण म्हणाले, कृषी  विधेयक संशोधनासाठी संसदीय समितीकडे पाठवावे असा आमचा आग्रह होता. किमान पक्षी भाजपाने आपला मित्र पक्ष असलेल्या अकाली दलाशी याबाबत चर्चा करायला हवी होती, मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करायला हवी होती पण त्यांनी ते ही केले नाही. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असं मोदी म्हणाले होते पण शेतकऱ्यांना सध्या हमीभावही मिळत नाही. हा काळा कायदा पुन्हा सरकारला पाठवून फेरविचार करायची मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे. शेतकरी विरोधी कायदे केंद्र सरकार मागे घेत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहिल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com