मुंबई : मेट्रोबाबतचा आजचा उच्च न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अहंकार, कार्यपद्धती यांच्यामुळे मुंबईकर मेट्रोपासून किमान पाच वर्षे दूर गेले आहेत, अशी टीका भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आज केली आहे.
उच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयानंतर त्यांनी एक व्हिडियो समाजमाध्यमांवर प्रसारित करून वरील प्रतिक्रिया दिली आहे. आजचा हा निर्णय दुर्दैवी असला तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अहंकार व त्यांची कार्यपद्धती यास जबाबदार आहे, असेही भातखळकर यांनी सुनावले आहे.
हाच घटनाक्रम सन 2015 मध्येही उच्च न्यायालयात झाला होता. तेव्हाच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळेच मेट्रोची कारशेड आरे मध्ये उभारण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. त्यांनी तसेच सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने यासंदर्भात नेमलेल्या तज्ञ समितीच्या शिफारशींकडे दुर्लक्ष करून आरेमधील कारशेडचे काम थांबवून ते कांजूरमार्ग ला नेण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला.
त्यामुळेच राज्यावर आणि मुंबईकरांवर ही पाळी आली, असे कोरडेही भातखळकर यांनी ओढले आहेत. सरकारच्या अहंकारामुळे आणि कायद्याला धरून न वागण्याच्या वृत्तीमुळे आज मुंबईकर मेट्रोपासून किमान पाच वर्षे दूर गेले आहेत. फक्त राज्य सरकार आणि शिवसेनाच याला जबाबदार आहेत, अशीही तोफ भातखळकर यांनी डागली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.