मुंबई : महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले तरी ते फार दिवस टिकणार नाही, असे भाकीत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
श्री. नितीन गडकरी म्हणाले, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांची विचारसरणी वेगवेगळी आहे. त्यामुळे ते सरकार अस्थिर राहील. परिणामी हे सरकार टिकणार नाही.
महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार बनविण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. कोणत्या पक्षाकडे किती व कोणती मंत्रिपदे असतील याबाबतची बोलणी अंतिम टप्प्यात आहेत. मात्र या हालचालींबाबत महाराष्ट्रातील भाजपचे वरिष्ठ नेते कोणतीही प्रतिक्रिया देताना दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया बोलकी आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.