राजेश टोपेंनी सांगितलं अन् सगळ्यांच्याच जीवात जीव आला!

मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.
Rajesh Tope

Rajesh Tope

Sarkarnama

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाची (Corona) रुग्ण संख्या वाढत असताना कडक निर्बंध लागू केले जाण्याचे संकेत मिळत आहेत. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी तीन दिवसांवर आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने (State Government) बुधवारी तातडीने बैठक घेत काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माहिती दिली. वाढत्या रुग्णसंख्येबाबत त्यांनी काहीसा दिलासा दिला आहे.

टोपे यांनी सांगितले की, राज्यात दररोज आढळून येत असलेल्या रुग्णांपैकी तब्बल 90 टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाही. तसेच उर्वरित रुग्णांपैकीही कमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. तसेच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच विलग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागिकांमध्ये कोरोनाची सौम्य किंवा लक्षणे विरहित असल्याचे आढळून येत आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिल्याने दिलासा मिळाला आहे.

<div class="paragraphs"><p>Rajesh Tope</p></div>
ओमिक्रॉनला हलक्यात घेऊ नका नाहीतर...! WHO चा गंभीर इशारा

राज्यासह देशभरात कोरोना रुग्णांच्या विलगीकरणाबाबतही वेगवेगळे नियम असल्याचे सांगत टोपे यांनी महाराष्ट्रात (Maharashtra) महत्वाचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. राज्यातील कोरोना रुग्णांचा विलगीकरणाचा (Quarantine) कालावधी आता सात दिवसच असणार आहे. कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णांना विलगीकरणातून मुक्त केले जाईल, असंही टोपे यांनी स्पष्ट केले. यापूर्वी विलगीकरणाचा कालावधी 14 दिवसांचा होता.

टोपे यांनी लसीकरणावर (Vaccination) भर दिला जाणार असल्याचेही सांगितले. लस न घेणाऱ्यांना त्यांना समजेल अशा भाषेत सांगावे लागणार आहे, असा इशारा देत टोपे म्हणाले, अधिकाधिक लसीकरण वाढवण्यावर भर देण्याचा सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण वेगाने करण्यासाठी प्रयत्न केले जातील. खासगी रुग्णालयांमध्ये बुस्टर डोस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहितीही टोपे यांनी दिली.

<div class="paragraphs"><p>Rajesh Tope</p></div>
ते मोदींशेजारी बसणार होते पण रस्त्यात असतानाच रिपोर्ट आला अन्...

दरम्यान, बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेल्या बैठकीत राज्यात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. लॉकडाऊनऐवजी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा सरकारचा विचार आहे, असे टोपे यांनी स्पष्ट केले. सरकारी कर्मचार्‍यांची उपस्थिती 50 ते 75 टक्क्यांवर आणली जाण्याची शक्यता आहे. खाजगी कार्यालयात वर्क फ्रॉम होम लागू करण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंटच्या वेळा कमी केल्या जाऊ शकतात. राजकीय, धार्मिक कार्यक्रमांवर आणखी निर्बंध लागू केले जाऊ शकतात, असे सुत्रांनी सांगितले.

राज्यातील 80 हून अधिक आमदार कोरोनाबाधित

मंत्री, आमदार सध्या कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. राजकीय व्यक्तींच्या सभा, रॅली, लग्नसोहळे यामुळे हे प्रमाण वाढत असल्याचे समोर येत आहेत. काही दिवसापूर्वी २० आमदार, १० मंत्री कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. आता ही संख्या वाढत आहे. आता ७० हून अधिक आमदार, १३ मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती राज्याचे मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी दिली आहे. बुधवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही कोरोनाबाधित झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com