मलिक-वानखेडे वादावर सोमवारी निकाल

महाविकास आघाडीतील ( Mahavikas Aghadi ) मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik ) व एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे ( Sameer Wankhede ) यांचे कुटूंबीय यांच्यातील वाद दिवाळीच्या अगोदर चांगलाच गाजला होता.
Nawab Malik and Sameer Wankhede
Nawab Malik and Sameer WankhedeSarkarnama

मुंबई : महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक व एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे कुटूंबीय यांच्यातील वाद दिवाळीच्या अगोदर चांगलाच गाजला होता. या प्रकरणी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात केलेल्या मानहानीच्या दाव्यात अतिरिक्त कागदपत्रे दाखल करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षकारांना दिली. दरम्यान, सोमवारी (ता. २२) यावर न्यायालय निकाल देणार आहे. Malik-Wankhede dispute verdict on Monday

ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात सव्वा कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. यावरील सुनावणी पूर्ण झाली असून न्या. माधव जामदार यांनी निकाल राखून ठेवला आहे. बुधवारी मलिक यांच्या वतीने ॲड. अतुल दामले यांनी अतिरिक्त कागदपत्रे दाखल करण्याची विनंती न्यायालयात केली. यावर वानखेडे यांच्या वतीने ॲड. अर्शद शेख यांनी बाजू मांडली. त्यानंतर न्या. जामदार यांनी दोन्ही पक्षकारांना अतिरिक्त कागदपत्रे देण्यासाठी परवानगी दिली. तसेच, यापुढे आणखी कागदपत्रे सादर करता येणार नाहीत, असेही स्पष्ट केले. येत्या सोमवारी (ता. 22) न्यायालय यावर निर्णय जाहीर करणार आहे.

Nawab Malik and Sameer Wankhede
कंगनाचा पद्मश्री काढून घ्यावा आणि गुन्हा दाखल करुन अटक करावी : नवाब मलिक

मलिक यांनी आज सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये मुंबई महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याचे प्रतिज्ञापत्र आहे. यामध्ये समीर वानखेडे यांनी नाव बदलल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला आहे. हा दाखला सेंट जोसेफ विद्यालय आणि सेंट पॉल विद्यालयाचा आहे. तसेच, सेंट पॉल विद्यालयात प्रवेश घेतानाचा अर्ज आहे. याचे खंडन करण्यासाठी वानखेडे यांनी महापालिकेच्या वतीने दिलेला डिजिटल जन्मदाखला आणि जात प्रमाणपत्र सादर केले आहे.

Nawab Malik and Sameer Wankhede
समीर वानखेडे शाळेच्या दाखल्यात मुस्लिमच! मलिकांचे उच्च न्यायालयात पुरावे

मलिक सतत वानखेडे यांच्याबाबत रोज नवीन खुलासे करत आहेत. यामध्ये ज्ञानदेव वानखेडे यांचे नाव दाऊद आहे आणि समीर यांनी मुस्लिम असूनही राखीव गटातून केंद्र सरकारची नोकरी मिळवली, असा आरोप केला आहे; मात्र हा आरोप आधारहिन आहे. मलिक निराधार आरोप करून आमची प्रतिमा मलीन करीत आहेत, असा आरोप वानखेडे यांनी केला आहे. मलिक यांच्याविरोधात सव्वा कोटी रुपयांचा मानहानीचा दावा त्यांनी केला असून यापुढे त्यांना कुटुंबाबद्दल काहीही विधान करण्यासाठी मनाई करण्याची मागणी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com