महिलांचे अस्तित्वच सरकारला अमान्य; शिंदे-फडणवीस सरकारवर मनसेची टीका

Shalini Thackeray|Eknath Shinde : मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
CM Eknath Shinde & Shalini Thackeray Latest News
CM Eknath Shinde & Shalini Thackeray Latest News Sarkarnama

मुंबई : शिवसेनेसोबत (Shivsena) बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सुमारे ४० बंडखोर आमदारांच्या साथीने आणि भाजपच्या समर्थनाने राज्यात नवं सरकार स्थापन केलं आहे. मात्र, मंत्रीमंडळ विस्तार करण्यासाठी या सरकारला ३९ दिवस लागले. यामुळे या सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात होती. यामुळे सरकारवर मोठा दबाव वाढला होता.

दरम्यान, नुकताच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला असून भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी 9 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आले नाही. यावरुन मनसेकडूनही (MNS) सरकारवर टीका करण्यात आली असून मनसे नेत्या शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी सरकारवर टीका केली आहे. (CM Eknath Shinde & Shalini Thackeray Latest News)

CM Eknath Shinde & Shalini Thackeray Latest News
Chitra Wagh : नितीशकुमार ज्या मार्गावर चाललेत त्याला राजकारणातला उद्धव मार्ग म्हणतात...

मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवरुन सरकारवर टीका केली आहे. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, 'महाराष्ट्रात शिवसेना बंडखोर गट आणि भाजप यांच्या युतीचं सरकार स्थापन होऊन 39 दिवस उलटल्यानंतर अखेर काल मंत्रिमंडळ विस्तार झाला. 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात एकही महिला मंत्री नाही. यावर अनेकांनी टीका केली की, राज्य सरकार महिलांना 'दुय्यम' वागणूक देत आहे. पण ही दुय्यम वागणूक नव्हे! राज्यातल्या 5 कोटी मुली, महिला यांचं अस्तित्वच हे सरकार अमान्य करत आहे, अशा शब्दात त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

CM Eknath Shinde & Shalini Thackeray Latest News
अमित ठाकरे तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर; १३ मतदारसंघात पदाधिकाऱ्यांच्या घेणार भेटी

दरम्यान, गेल्या महिनाभरापासून राज्याच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. परिणामी राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या समर्थनाने राज्यात नवं सरकार स्थापन केलं. मात्र मंत्रिमंडळ विस्तार ३९ दिवस रखडला होता.अखेर तो काल (ता.९ ऑगस्ट) पार पडला मात्र या मंत्रीमंडळ विस्तारात एकाही महिलेला स्थान न दिल्याने विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. यामध्ये भाजपच्या जवळ असलेला पक्ष मनसेकडूनही आता यामुद्द्यावरून शिंदे सरकारवर टीका करण्यात आली आहे. यावर आता शिंदे गट किंवा भाजपकडून काय प्रत्युत्तर देण्यात येते हे बघावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com