उद्धव ठाकरे हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली
Raj Thackeray, Uddhav Thackeray
Raj Thackeray, Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : राज्यात सुरु असलेल्या राजकीय गदारोळावर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाष्य केले आहे. त्यांनी एका मराठी वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला. (Raj Thackeray Latest Marathi News)

2014 आणि 2017 मध्ये तुम्ही उद्धव ठाकरेंना टाळी देण्याचा प्रयत्न केला होता? असा प्रश्न राज ठाकरे यांना करण्यात आला होता. त्यावर राज ठाकरे म्हणाले, तो माणूस बोलतो वेगळे आणि करतो वेगळे विश्वास ठेवण्यासारखे नाही. बाकीच्या लोकांचे मला वाईट वाटते मात्र, हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही" अशा शब्दांत राज यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचे बाण सोडले.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या हाती शिवबंधन; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

शिवसेनेमध्ये फुट बघायला मिळतात आहे, अशा परिस्थितीमध्ये जर बाळासाहेब असते तर अशी परिस्थिती ओढवाली असती का? यावर राज ठाकरे म्हणाले, शक्यच नाही, याच कारण ते तुम्ही शिवसेना एक पक्ष किंवा संस्था म्हणून बघू नका, ती एका विचाराने बांधली गेलेली माणसे होती. बाळासाहेब होते तोपर्यंत तो विचार होता. त्या विचारासोबत बांधली गेलेली माणसे होती. त्यामुळे बाळासाहेब असते तर हे शक्यच नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले.

जी परिस्थिती तयार झाली त्या परिस्थितीला तुम्ही कोणाला कारणीभूत ठरवाल? शिवसैनिक जबाबदार आहे? की मग भाजपने शिवसेना फोडली? की मग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी शिवसेना फोडली? यावर ते म्हणाले, त्या दिवशीच माझ्याकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. मी त्यांना म्हटले उगाच फुकटचे श्रेय नका घेऊ, जी गोष्ट घडली आहे. ते हसायला लागले जोरात. जी गोष्ट घडली आहे, ती गोष्ट ना तुम्ही घडवली, ना अमित शाहांनी घडवली, ना भाजपने घडवली ना अजून कोणी घडवली, असेही ते म्हणाले.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
पक्षश्रेष्ठींनी सांगितले असते तर मी घरी गेलो असतो ; फडणवीसांचे स्पष्टीकरण

याचे श्रेय तुम्हाला उद्धव ठाकरेंनाच द्यावे लागेल, असे राज यांनी स्पष्ट केले. जी गोष्ट घडलेली आहे त्याचे तुम्ही श्रेय कसे काढून घेऊ शकता? कारण हे काय एकदा घडले नाही त्यांच्यामुळे. जे काय सगळे आरोप प्रत्यारोप झाले आणि सगळ्यांनी संजय राऊत यांना झोडून काढले. संजय राऊतांचा काय संबंध आहे, असा प्रश्न त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com