आपल्या राजकीय खूनाचा प्रयत्न; आव्हाडांच्या गौप्यस्फोटाने उडाली खळबळ

ठाण्यातील शिवसेनेचे नेते व आव्हाडांमधील राजकीय हेवेदावे जगजाहीर आहेत. आता हा वाद अधिकच चिघळल्याचे आव्हाडांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.
 Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी कॉग्रेसचे (NCP) नेते, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलेल्या गौप्यस्फोटानं राजकारणात (Politics) खळबळ उडाली आहे. माझा राजकीय खून करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा आव्हाडांनी केला आहे. ठाण्यातील शिवसेनेचे (Shiv Sena) नेते व आव्हाडांमधील राजकीय हेवेदावे जगजाहीर आहेत. आता हा वाद अधिकच चिघळल्याचे आव्हाडांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.

ठाणे महापालिकेची निवडणूक (TMC Election) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. महापालिकेच्या वॉर्डरचनेवरून राजकारण तापू लागले आहे. याबाबत आव्हाड यांनी शिवसेनेच्या नेत्यांसह महापालिका आयुक्तांवर नाराजी व्यक्त करत हा आरोप केला आहे. आघाडी करण्याची आपली इच्छा आहे, पण तुमची इच्छा नसेल तर काय करणार असा सवाल करत आव्हाड म्हणाले, माझाच राजकीय खून करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मग मी बचावात्मक भूमिका घेणार की नाही.

 Jitendra Awhad
काँग्रेसचा दे धक्का! 'या' राज्यात थेट भाजपसोबत सत्तेत जाऊन बसले

आपल्या मतदारसंघातील जागा 23 वरून 18 वर आणल्याचे सांगत आव्हाड म्हणाले, कळव्याचा एक वॉर्ड बनवताना तो मुंब्रापर्यंत नेला. त्यासाठी कोणतं गणित लावलं हे कळालं नाही. पालकमंत्र्यांकडून असा प्लॅन केला जात नाही. आयुक्तांनी त्यांच्या मनानेच केले असावे. एकूण 24 जागांपैकी सात हिंदू जागा आहे. यातून मुस्लिम द्वेषाचा प्रकार असल्याचे दिसते, असा आरोप आव्हाड यांनी केला.

ठाण्यात आघाडी झाल्यास दोघांचाही फायदा आहे. पण सध्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातही एवढा त्रास झाला नव्हता, अशी प्रतिक्रियाही आव्हाड यांनी दिली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बोलताना आव्हाडांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. ठाणे महापालिका निवडणुकीसंदर्भात ते म्हणाले होते की, इतरांची इच्छा असेल तर सोबत राहू. कुणीही राजकीय मग्रुरी दाखवू नये. शिवसेना नेते प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कार्यकर्त्यांना समजावं", अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली होती.

आव्हाड म्हणाले होते की, जर इतरांची इच्छा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस हात सोडणार नाही. पण कुठला पक्ष राजकीय मग्रुरीमध्ये आमची सत्ता आहे, आम्ही सत्ता आणू शकतो, आमची सत्ता होती वगैरे सांगत असेल तर मग प्रत्येकाला लढायचे मार्ग मोकळे आहेत. माझी स्थानिक आमदार प्रताप सरनाईक, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की, आपण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावं आणि एक सक्षम आघाडी बनवू. वर्षोनुवर्षे महापालिका पोखरुन खाललेल्या भाजपला घरी बसवावं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com