Raj Thackeray News : शिवसेनेचे धनुष्यबाण हे शिवधनुष्य आहे. हे शिवधनुष्य बाळासाहेब ठाकरे सोडून इतर कुणालाही पेलणार नाही, मला माहित होते. एकाला झेपले नाही दुसऱ्याला बघा आता झेपते का?, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेनेत झालेल्या फुटीवरुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे हे शिवाजी पार्क मैदानावरून कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले, लहानपणापासून मी तो पक्ष पाहात आलो आहे, तो पक्ष जगलो आहे. मी दुसरीत होतो तेव्हा माझ्या शर्टवर वाघ असायचा, अशी आठवण राज ठाकरे यांनी सांगितले. मी राजकारण लहान असल्यापासून पाहात आलो आहे. बाळासाहेबांच्या सोबत अनुभवत आलो. शिवसेना अनेक लोकांच्या कष्टातून उभी राहिली. ज्यावेळेला शिवसेना (Shivsena) आणि धनुष्यबाण हे तुझे का माझे की तुझे सुरु होते, तेव्हा वेदना होत होत्या, असे राज ठाकरे म्हणाले.
मी जेव्हा त्या पक्षातून बाहेर पडलो त्या पक्षातून बाहेर पडल्यानंतर मी इथे जेव्हा भाषण केले होते तेव्हा म्हटले होते. ''माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही तर आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. मी तेव्हा हेदेखील म्हटले होते हीच चार टाळकी हा पक्ष खड्ड्यात घालणार आहेत. २००६ मध्ये जेव्हा मी पक्ष स्थापन केला, तेव्हा तो याच शिवतीर्थावर केला होता. मात्र, त्या भाषणात काय झाले कशामुळे झाले तो चिखल करायचा नव्हता, आजही करायाचा नाही आहे. मात्र, काही गोष्टी पसरवल्या गेल्या आहेत. राज ठाकरेंना शिवसेनापक्षप्रमुख पद हवे होते. राजला मिळाले नाही म्हणून बाहेर पडला, माझ्या स्वप्नातही हा विचार आला नव्हता, असेही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
मी एके दिवशी उद्धवसोबत हॉटेल ओबेरॉयला गेलो होतो. तिथे मी त्याला बसवलो आणि उद्धवला विचारले की तुला काय हवे आहे? तुला पक्षाचा प्रमुख व्हायचं आहे का? हो. तुला मुख्यमंत्री व्हायचे असलेत तर सत्ता आल्यावर हो. मला फक्त सांग की माझ काम काय आहे? मला फक्त प्रचाराला बाहेर काढू नका. मला उद्धव म्हणाला की मला काहीही प्रश्न नाही आहे. मी विचारले ठरले? तो म्हणाला हो ठरले. मी घरी आल्यावर बाळासाहेब ठाकरे झोपले होते. मी त्यांना उठवले त्यांना सांगितले सगळी समस्या सोडवली आहे.
आमच्या दोघांमध्ये आता काही वाद नाही आहेत. बाळासाहेबांनी मला मिठी मारली आणि म्हणाले उद्धवला बोलवा. पाच मिनिटे तो आला नाही. बाळासाहेबांनी मला सांगितले त्यांना बोलवा बोलावयाला गेलो तो तिथून निघून गेले होते. त्यावेळी मला कारण नसताना त्रास दिला जात होता. मी बाहेर कसा पडेन यासाठी सगळे राजकारण सुरु होते, असा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.