Tanaji Sawant : गोवरचा संसर्ग कसा रोखणार ? तानाजी सावंतांनी दिले उत्तर

गोवरच्या संसर्गामुळे आतापर्यतं राज्यात दहा मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे
Tanaji Sawant
Tanaji Sawant

Tanaji Sawant : गोवरचा संसर्ग रोखण्यात प्रशासनाला यश येतयं पण गोवरला रोखायचं असेल तर लसीकरण एकमेव पर्याय आहे, असे राज्याचे आरोग्य मंंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. इतकेच नव्हे तर यापुढे बालकांना गोवर चा संसर्ग होणारच नाही, यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आमच्या टीम जवळपास वीस लाख लोकांपर्यंत पोहचल्या असून तपासण्या करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात प्रत्येक वॉर्डनिहाय गोवरची लक्षणे असलेले केसेस शोधणे, त्यांना लसीकरण करणे, चोवीस तास सेवा पुरवणे या कामांमुळे गोवरचा संसर्ग आटोक्यात आणण्यात आम्हाला यश आले असल्याचा विश्वास तानाजी सावंत यांनी व्यक्त केला आहे.

गोवरच्या संसर्गामुळे आतापर्यतं राज्यात दहा मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामुळे राज्यात सध्या भितीचे वातावरण आहे. याबाबत तानाजी सावंत यांनी गोवरची साथ रोखण्यासाठी नागरिकांना आवाहन केलं आहे. ज्या ठिकाणी मुले दगावली गेलीत त्या ठिकाणांच्या माता भगिनींनी तुमच्या भागात आलेल्या डॉक्टर्सना, पथकांना सहकार्य करा, आपल्या मुलांची तपासणी करुन घ्या, आपल्या मुलांचं लसीकरण झालय की नाही, याची संपुर्ण माहिती द्यावी आणि लसीकरण करुन घ्या, तुमच्या, स्थानिक लोकप्रतिनींधीच्या, डॉक्टरांच्या सहकार्याने आपण या गोवरची साथ नियंत्रित करु, आणि कुटूंबियांना मी आवाहनही मंत्री सावंत यांनी केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com