एनसीबीला वानखेडेंचा रामराम; कार्यकाळ 31 डिसेंबरला अखेर संपणार

अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
Sameer Wankhede
Sameer Wankhedesarkarnama

मुंबई : अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. एनसीबीतील त्यांच्या नियुक्तीला वादाचा मोठी किनार आहे. यातच वानखेडे यांनी एनसीबीला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. एनसीबीने वानखेडेंना आधी दिलेली 4 महिन्यांची मुदतवाढ 31 डिसेंबरला संपत आहे. वानखेडेंनी मुदतवाढ न मागितल्याने त्यांच्या एनसीबीतील कार्यकाळ अखेर संपुष्टात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे यांचा एनसीबीतील कार्यकाळ 31 डिसेंबरला संपत आहे. अद्याप वानखेडे यांनी कार्यकाळ वाढवण्यासाठी अर्ज केलेला नाही. तसेच, मुदतवाढीबाबत मुख्य कार्यालयातूनही त्यांना काहीही सांगण्यात आलेले नाही. वानखेडे यांना ऑगस्टमध्ये 4 महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती. आता त्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे वानखेडे हे एनसीबीचा कार्यकाळ संपल्यानंतर दीर्घ रजेवर जाणार आहेत.

Sameer Wankhede
सावधान! देशात ओमिक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट येणार; सरकारी तज्ञ समितीचा अंदाज

क्रूझ पार्टी (Cruise Party) प्रकरणाच्या तपासावरच उच्च न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशात एनसीबीकडे कोणतेही पुरावे नसल्याची बाब अधोरेखित करण्यात आली होती. आदेशात म्हटले होते की, आर्यन, अरबाझ आणि मुनमुन यांच्या विरोधात त्यांनी अमली पदार्थांसाठी कट आखल्याचे कोणेतेही पुरावे नाहीत. याचबरोबर त्यांच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्येही काही आक्षेपार्ह आढळलेले नाही. या आरोपींनी समान हेतू ठेवून बेकायदा कृत्य केल्याचा एकही पुरावा न्यायालयासमोर आलेला नाही. ते तिघे एका क्रूझमधून प्रवास करीत होते म्हणून त्यांना कटाचा भाग ठरवणे शक्य नाही. तसेच, तिघांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली नव्हती. त्यामुळे संबंधित वेळी त्यांनी अमली पदार्थांचे सेवन केले होते हेसुद्धा स्पष्ट होत नाही.

Sameer Wankhede
केंद्रीय गृह सचिवांच्या नावाने दोनशे कोटींची वसुली अन् तीही जेलमध्ये बसून!

तपास अधिकाऱ्यांनी आरोपींच्या घेतलेल्या कबुलीजबाबावर एनसीबी विसंबून राहू शकत नाही. कारण हे कबुलीजबाब न्यायालयात ग्राह्य धरले जात नाहीत, असेही उच्च न्यायालयाने आदेशात म्हटले होते. उच्च न्यायालयानेच आता एनसीबीच्या तपासावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणारे समीर वानखेडे हे अडचणीत आले आहेत. वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांच्याकडून हा तपास सध्या काढून घेण्यात आला आहे. तसेच, त्यांची खातेअंतर्गत चौकशी सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com