सरकारनामा ब्यूरो
पुणे : सुस-म्हाळुंगे या गावांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी या भागातील माजी नगरसेवक अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.सुस-म्हाळुंगे गावांसोबत पुणे महापालिका हद्दीत हद्दीत समाविष्ठ २३ गावांच्या पाणी प्रश्नाबाबत दाखल केलेल्या जनहित याचिकेची माहिती बालवडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याचिकेत पुणे महापालिका व पीएमआरडीएला प्रतिवादी करण्यात आले आहे. पीएमआरडीए व पुणे महानगरपेलिका नागरिकांचे मुलभूत प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष करत आहे. या दोन्ही संस्था पिण्याचे पाणी पुरविण्याची जबाबदारी स्विकारत नाही.पीएमआरडीए बांधकाम नकाशे मंजूर करत असेल तर पाणी देण्याची जबाबदारी सुद्धा त्यांनीच घेतली पाहिजे.जर ही जबाबदारी स्विकारत नसाल तर पएिमआरडीएने बांधकाम नकाशे मंजूर करणे थांबवावे जेणेकरून या भागाचा पाणी प्रश्न अजून गंभीर होणार नाही, असे बालवडकर यांनी याचिकेत म्हटले आहे.
या भागातील नागरिकांना मुलभूत गरज असलेले पाणी देण्याची जबाबदारी कोणाची..? हे न्यायालयाने स्पष्ट करावे. जर पाणी देण्याची जबाबदारी पीएमआरडीए स्वीकारत नसेल तर त्यांना बांधकाम नकाशे मंजूर करण्यासाठीचे अधिकार उच्च न्यायालयाने काढून घ्यावेत तसेच पाण्याबाबत बिल्डरांकडून हमीपत्र घेणे थांबवावे.
समाविष्ट गावातील सोसायटींना तसेच बांधकामांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी पाण्याच्या टाक्या, पाण्याच्या पाईप लाईन्स व इतर मुलभूत पायाभूत सुविधा करण्याचे काम संबंधित यंत्रणेने सुरु करावे व तो पर्यंत या सोसायटींना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करावा.समाविष्ठ गावांना पाणी पुरवठा करण्याबाबत आराखडा उच्च न्यायालयात सादर करावा. त्यासाठी कितवेळ लागेल हे संबंधितांनी स्पष्ट करावे. अशी भूमिका याचिकेत मांडण्यात आली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.