पुणे: "माझ्यातल्या कार्यकर्त्याने माझ्यातल्या शेतकऱ्यावर अन्याय केला. सार्वजनिक जीवनात होतो त्यामुळे शेतीकडे लक्ष देता येत नव्हते आता शेतीकडे लक्ष देईन," असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले.
स्वाभिमानी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्यावतीने आज पुण्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला होता. यावेळी शेट्टी बोलत होते.
शेट्टी म्हणाले, मी राजकारणात नव्हतो तेव्हा शेती करायचो. एकदा मी शेतात पिकवलेली पपई विकायला मुंबईला गेलो. तेव्हा मला पपई विकून एक रुपायाही मिळाला नाही. जे पैसे मिळाले त्यातून फक्त टेम्पोचे भाडे भागले. परत येताना माझ्याजवळ जेवायला सुद्धा पैसे राहिले नव्हते. तेव्हा मला वाटले आज माझ्यावर जी वेळ आलीय ती कोणत्याही शेतकऱ्यावर येऊ नये. यासाठी काय केले पाहिजे असा विचार करत असतानाच शेतकरी चळवळीत आलो. मी जेव्हा शेती करत होतो तेव्हा मन लावून शेती करायचो. शेतीत नवीन प्रयोग करायचो. पण राजकीय जीवनात आल्यावर माझे शेतीकडे दुर्लक्ष झाले होते. आता पुन्हा शेतीकडे लक्ष देईन. शेतीत नवे प्रयोग करेन."
"खासदार होतो तेव्हा मला देशातील कोणत्याही राज्यातून शेतकऱ्यांनी बोलावले तर जाता येत होते. मला विमानप्रवासाचा खर्च नव्हता. पण आता मात्र मला तो खर्च करणे अशक्य आहे. त्यामुळे माझ्या कामावर थोड्या मर्यादा येणार आहेत. खासदार म्हणून मला जो पगार मिळत होता त्यातून चळवळीचा खर्च करता येत होता पण आता काटकसर करावी लागणार आहे," असे शेट्टी म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.