निवडणुका कधीही लागतील तयारीला लागा - प्रफुल्ल पटेल 

ncp-symbol
ncp-symbol

मुंबई : केंद्रातील भाजप सरकारची साडेतीन वर्षे संपली, आता दीड वर्षे उरली आहेत. लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुका लागू शकतात. हे भाजप सरकार काहीही निर्णय घेऊ शकते. निवडणुका कधीही होतील. त्यामुळे कामाला लागा, असे सुस्पष्ट आदेश राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सर्व पदाधिका-यांना आजच्या चिंतन बैठकीत देण्यात आले.

पक्षाच्या वतीने ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी ही भूमिका मांडली. या शिबिरासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड, पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक,पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, आमदार, खासदार उपस्थित आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट आली होती. आता ही लाट पुर्णपणे ओसरली आहे. सोशल मीडियावर मोदी सरकारचे अगोदर कौतुक व्हायचे, आता तीन महिन्यांपासून सामान्य जनता टीका करू लागली आहे असे  श्री . पटेल यांनी प्रतिपादन केले .

देशभरात सरकारविरोधी वातावरण पसरले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपचे सरकार येणार नाही, असे सांगत मनता बॅनर्जी मुंबईत आल्या होत्या. त्या शरद पवार यांनाही भेटण्यास इच्छूक होत्या. त्यांनी पवार यांना भेटण्याबाबत विचारणा केली होती अशीही माहिती त्यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com