पारनेर : दुध आंदोलनप्रसंगी अधिक गर्दी झाली, तर गुन्हे दाखल करा, असा आदेश देऊन दुध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. मात्र वेळ पडली, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहाणार नाही, असा इशारा खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी दिला.
पारनेर तालुक्यात दुध उत्पादकांच्या आंदोलनात ते बोलत होते. दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात पालमंत्री अपयशी ठरले आहेत. त्यांना जिल्ह्यात साधे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य त्यांच्याच पक्षाचे आमदार घेऊ देत नाहीत, अशी खरमरीत टीका खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी केली.
पारनेर तालुक्याचा प्रभारी या नात्याने मी पारनेरमध्ये आलो आहे. दुधउत्पादक शेतकरांना दुधाला प्रती लीटर 30 रूपये भाव मिळाला पाहिजे, वाढीव आलेली वीज बीले माफ करावित, शेतकऱ्यांना खताचा पुरवठा सुरळीत करावा, दुधभुकटीला किमान 50 रूपये प्रतिकिलोचे अनुदान द्यावे, अशी मागणी या वेळी विखे पाटील यांनी केली.
केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी तीन पक्षाचे सरकार स्थापण करण्यात आले आहे. ते जनतेला मान्य नाही. त्यामुळे फार काळ हे सरकार टिकणार नाही. याचे उदाहरण पारनेर तालुक्यातील राजकीय घडामोडीने दाखविले आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून पुढील आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याचे खासदार विखे यांनी या वेळी स्पष्ट केले.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. तरीही लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला नाही. जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर आहे, असे ते म्हणाले.
Edited By - Murlidhar Karale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.