शब्द पाळणे हे माझ्या रक्तातच : छत्रपती संभाजीराजे

'दिलेला शब्द पाळणे हे माझ्या रक्तात आहे. मला सिंहासनाची आस नाही. सर्वसामान्य जनतेत, शेतकऱ्याच्या मांडीला मांडी लावून बसणे हेच माझे खरे सिंहासन आहे - छत्रपती संभाजीराजे
शब्द पाळणे हे माझ्या रक्तातच : छत्रपती संभाजीराजे

नाशिक : मी कोणतेही काम राजकारणासाठी करीत नाही. विकास व्हावा म्हणून माझी धडपड असते. दिलेला शब्द पाळणे हेच माझ्या रक्तात आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या विकासासाठीच काम करीत राहीन असे छत्रपती खासदार संभाजीराजे म्हणाले यांनी नाशिकमध्ये बोलतान ठामपणे सांगितले.

छत्रपती संभाजीराजेंच्या हस्ते पंचायत समितीच्या इमारतीचे उद्‌घाटन होते. यानिमित्ताने त्यांच्या उपस्थितीत दाभाडी (मालेगाव) येथे शेतकरी मेळावा झाला. यावेळी ते म्हणाले, ''दिलेला शब्द पाळणे हे माझ्या रक्तात आहे. मला सिंहासनाची आस नाही. सर्वसामान्य जनतेत, शेतकऱ्याच्या मांडीला मांडी लावून बसणे हेच माझे खरे सिंहासन आहे. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी दाभाडीनजीक आलो.''

ते पुढे म्हणाले, ''विकासाच्या कामासाठी कोणीही राजकारण करु नये. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ६६ ऐतिहासिक किल्ले असून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आपली आहे. मालेगावच्या किल्ल्याभोवती मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. पुढील काळात मी मालेगावी येणार असून अतिक्रमण काढण्याबाबत चर्चा करणार आहे. शेतकरी राजा कर्जबाजारी होतोय ही चिंतनाची बाब आहे.''

''गेल्या वीस वर्षात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या का झाल्या याबद्दल चिंतन करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे महत्वाचे असून छत्रपती शाहू महाराजांच्या स्वप्नानुसार माझ्यापेक्षा माझा शेतकरी मोठा झाला पाहिजे,'' असे प्रतिपादनही खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले. अद्वयआबा हिरे मित्र मंडळातर्फे झालेल्या शेतकरी मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे होते. व्यासपीठावर माजीमंत्री प्रशांत हिरे, आमदार अपुर्व हिरे, युवानेते अद्वय हिरे उपस्थित होते.

भुईकोटचे अतिक्रमण काढा
छत्रपती संभाजीराजे म्हणाले, ''नाशिक जिल्ह्यात पासष्ट गड-किल्ले आहेत. या किल्ल्यांची व्यवस्था, देखभालीसाठी केवळ शासनावर विसंबून राहता येणार नाही. नागरीकांनी त्यासाठी सक्रीय सहभाग दिला पाहिजे. पुढाकार घेऊन त्याचे जतन कसे होईल याची काळजी घ्यावी. मालेगावचा भुईकोट किल्ला ऐतिहासिक आहे. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्याभोवतीचे अतिक्रमण पाहून खेद वाटला. पुढच्या वेळी येईन तेव्हा हे अतिक्रमण काढण्यासाठी स्वतः पुढाकार घेईन.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com