युतीला  लग्न होऊनही संसार मात्र थाटता येत नाही राजीव सातव 

Rajiv-Satav
Rajiv-Satav

हिंगोली :   राज्यात जनतेने युतीच्या बाजूने कौल दिला आहे, शिवसेना-भाजपा युतीकडून पंधरा दिवस होऊनही सत्ता स्थापन झाली नाही. युतीची अवस्था म्हणजे लग्न होऊनही संसार मात्र थाटता येत नसल्याचा प्रकार असल्याची टिका काँग्रेसचे नेते तथा माजी खासदार   राजीव सातव यांनी दुरध्वनीवरून बोलतांना केली आहे.

राज्यातील सरकार स्थापनेच्या परिस्थितीवर बोलतांना ते म्हणाले की, राज्यात भाजपा -शिवसेना युतीने व काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीने एकत्र येऊन विधानसभा निवडणुका लढविल्या आहेत. या निवडणुकीत राज्यातील जनतेने युतीच्या बाजूने कौल दिला आहे. 

मात्र जनतेचा कौल असतांनाही युतीकडून सरकार स्थापनेसाठी उशीर का  लागत आहे हा गंभीर विषय आहे. निवडणुकीपुर्वी भाजपा व शिवसेनेमधे झालेल्या चर्चेनुसार दोघांनीही काम केले पाहिजे. त्यांचा  साखरपुडा झाला, लग्नही झाले अन संसार मात्र थाटला जात नाही. यामधे राज्यातील जनतेचे मोठे नुकसान होत आहे.

राज्यात एकीकडे परतीच्या पावसाने हाहाःकार उडवून दिला असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र या परिस्थितीत सरकार मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीत गंभीर नसल्याचे दिसत आहे. सत्तेसाठी सरकारकडून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आता युतीच्या नेत्यांनी जनतेला अधिक काळ वेठीस न धरता सरकार स्थापन करून निवडणुकीच्या तोंडावर जनतेल्या दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केली पाहिजे अशी अपेक्षाही श्री . सातव यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असून काँग्रेस पक्ष विरोधीपक्षात बसण्यास तयार आहे. विधानसभेत काँग्रेस विरोधीपक्षाची भुमीका पार पाडणार असल्याचे श्री.  सातव यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com