कोल्हार घोटी रस्त्यासाठी थोरातांच्या प्रयत्नातून सात कोटी

वाहतुकीची मोठी घनता असल्याने या महत्वाच्या राज्यमार्गाची वारंवार दुरवस्था होते आहे. या मार्गाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवूनही कोरोना संकट व शासनाच्या विविध निर्बंधांमुळे या कामाची निविदा करण्यास विलंब झाला होता.
balasaheb thorat 1.jpg
balasaheb thorat 1.jpg

संगमनेर : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमुळे संगमनेर शहरातून जाणाऱ्या, अती वर्दळीच्या व कायम वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या, कोल्हार घोटी राज्यमार्गाच्या दुरुस्ती व डांबरीकरणाच्या कामाला अखेर मंजूरी मिळाली आहे. सुमारे सात कोटी रुपये खर्चाच्या य़ा रस्त्याचे काम मालपाणी इस्टेट (अकोले रोड) ते कोंची फाटा या अंतरात होणार असून, मार्च महिन्यात या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी दिली. 

त्या म्हणाल्या, की वाहतुकीची मोठी घनता असल्याने या महत्वाच्या राज्यमार्गाची वारंवार दुरवस्था होते आहे. या मार्गाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवूनही कोरोना संकट व शासनाच्या विविध निर्बंधांमुळे या कामाची निविदा करण्यास विलंब झाला होता. आता शासनाने रस्त्यांच्या निविदांवरील निर्बंध उठवल्यामुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाची निविदा काढली आहे.

या कामास साधारणतः मार्च महिन्यापासून सुरवात होणार आहे. या अंतर्गत दिल्ली नाका परिसरातील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. तसेच दिल्ली नाका चौकापासून समनापूर हद्दीतील गणपती मंदिरापर्यंतचे जुने दुभाजक काढून नवीन दुभाजक टाकण्यात येणार आहेत. तसेच या मार्गावरील जीर्ण पथदिवेही बदलण्यात येणार आहेत. तसेच शहरातील तीनबत्ती चौक, मेनरोड ते म्हाळुंगी पूल (अकोले रोड) या रस्त्याचे नवीन डांबरीकरण करून म्हाळुंगी पूल, नाटकी पूलाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. या कामामुळे या महत्वाच्या मार्गाची दूरवस्था संपून वाहतुक सुरळीत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
 

हेही वाचा...

सारोळेपठार येथील माजी सरपंच व ग्रामसेवकावर अपहाराचा गुन्हा दाखल

संगमनेर : तालुक्याच्या पठार भागातील सारोळेपठार येथील ग्रामपंचायतीचा माजी सरपंच व ग्रामसेवकाने 2014 - 15 व 2017 - 18 या कालावधीत कामे न करता, शासकिय निधीतून सुमारे 25 लाख रुपयांच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनिल माळी यांच्या फिर्यादीवरुन, माजी सरपंच प्रशांत गवराम फटांगरे व तत्कालिन ग्रामसेवक सुनिल शेळके यांच्याविरुध्द फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी अमित बादशहा फटांगरे यांनी मूळ तक्रार केली होती. त्याप्रमाणे या प्रकरणाच्या चौकशीसाठी गटविकास अधिकारी यांनी त्रिसदस्यीय समिती गठीत केली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार सरपंच व ग्रामसेवकाने 2014 - 2015 ते 2017 - 2018 या काळात आर्थिक गैरव्यवहार व अनियमितता केल्याचा अहवाल दिला. यावर म्हणणे मागितले असता, सरपंचांनी म्हणणे सादर केले नाही. कामाचे अंदाजपत्रक घेणे, मूल्यांकन आदी कामांना ग्रामपंचायत सभेची मान्यता न घेता सरपंच फटांगरे यांनी 11 लाख 72 हजार रुपये स्वतःच्या नावाने धनादेश घेत काढले. तसेच संयुक्त जबाबदारी असलेल्या बँक खात्यातून काढलेल्या रकमेतील 50 टक्के रकमेलाही त्यांना जबाबदार धरण्यात आले. अशा प्रकारे सरपंचाने 16 लाख 13 हजार तर, ग्रामसेवकाने 9 लाख 8 हजार असा एकूण 25 लाख 21 हजार रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी सरपंचाने तब्बल 82 वेळा सरपंचाने स्वतःच्या नावे धनादेशाने पैसे काढले असल्याचे चौकशीत समोर आले आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेकडेही अहवाल पाठवण्यात आला होता. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी फिर्याद दाखल करण्याचा आदेश दिला. या संदर्भात जिल्हा परिषद व पंचायत समितीने सर्व सक्षम पुरावे गोळा केले आहेत. असे प्रकार घडत असल्याने महाराष्ट्रातील ग्रामसेवकांमधूनचर्चा होत आहे.
 

Edited By  - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com