नागपूर : अडकून पडलेल्या प्रवाशांना स्वगृही पोहोचता यावे, यासाठी रेल्वेकडून स्पेशल ट्रेन चालविण्यात येत आहेत. काल रवाना झालेल्या 3 गाड्या बुधवारी नागपूर स्टेशनवर पोहोचल्या. या गाड्यांमधून एकूण 340 प्रवाशांचे आगमन झाले, तर 330 प्रवासी आपल्या डेस्टिनेशनकडे रवाना झाले.
नवी दिल्ली- बिलासपूर ट्रेन सकाळी 6.30 वाजता पोहोचली. या गाडीतून 142 प्रवासी उतरले तर 190 प्रवासी रवाना झाले. दुपारी 3.35 वाजता पोहोचलेल्या नवी दिल्ली-बेंगळुरू ट्रेन मधून 123 प्रवासी पोहोचले, तर 39 प्रवासी रवाना झाले. सकाळी 10.50 वाजता दाखल झालेल्या बेंगळुरू -नवी दिल्ली ट्रेन मधून 77 प्रवासी उपराजधानीत पोहोचले तर 97 प्रवासी रवाना झाले.
जाणाऱ्या प्रवाशांना इटारसी एन्ड कडील पायदळ पुलावरून फलाट क्रमांक 2 वर नेण्यात आले. येणाऱ्या प्रवाशांना मुंबई एन्ड कडील पुलावरून प्रवेशद्वाराकडे पोहचविण्यात आले. स्कॅनर मशीनमध्ये सामानाची तपासणी झाल्यावर प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात आली. ऐनवेळी यंत्र बंद पडल्याने दोन प्रवाशांना थांबवून वेगळे करण्यात आले. दुसऱ्या यंत्राने तपासणी करून त्यांना जाऊ देण्यात आले. सर्व प्रवाशांच्या हातावर क्वारंटाइनचे शिक्के लावण्यात आले. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करण्यात आला. प्रवाशांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अँप असल्याची खात्री करून घेण्यात आली. प्रवाशांना सोडून देण्यासाठी आपली बसची व्यवस्था करण्यात आली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.